Breaking News

दारू नको तर दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा उध्दव ठाकरे यांनी राज्य सरकारला सुनावले

मुंबईः प्रतिनिधी
घरपोच ऑनलाईन दारू पोहोचविण्याचा प्रकार आक्षेपार्ह व धक्कादायक असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली.
काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेला घरपोच दारू पुरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यावर एकाबाजूला राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना दुसऱ्याबाजूला सरकारने मदत देण्याऐवजी ऑनलाईन दारू विक्रीला सुरुवात करत असल्याच्या निर्णयावर उध्दव ठाकरे यांनी टीका केली.
घरपोच दारूच्या बाटल्या पोहोचविण्यापेक्षा राज्यातील दुष्काळग्रस्तांना तातडीने घरपोच मदत पोहोचवा असे राज्य सरकारला सुनावले.
ऑनलाईन दाऊ देणे हे आपल्या संस्कृतीला शोभणार नाही. पण राज्याची शोभा करण्याचा प्रयोग रोजच सुरु असल्याचे सांगून उध्दव ठाकरे यांनी दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले.
ते म्हणाले, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती भयानक आहे. मंत्री फिरत आहेत. त्यांचे अहवाल येतील तेव्हा येतील. केंद्राकडे मदतीसाठी याचना होतील. दुष्काळग्रस्तांना पुन्हा रांगेत उभे करून मारू नका. त्यांना घरपोच दारू नकोय तर मदत हवी असल्याची आठवणही त्यांनी यावेळी सरकारला दिली.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *