मुंबईः प्रतिनिधी
भाजप सरकार डिझास्टर मॅनेजमेंट नाही तर डिझास्टर टुरिझम करत आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ते सैरसफाटा मारायला आणि सेल्फी काढण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला.
हे भाजप सरकार असंवेदनशील आहे. वेळेवर निर्णय घेत नाही. लोकं आज अडचणीत आहेत आणि हे प्रचार कसा होईल याकडे यांचे लक्ष आहे.
सरकारचा हा भोंगळ कारभार राज्यातील जनता पहात असून ही जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
Tags bjp flood situation girish mahajan nawab malik ncp
Check Also
शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…
लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …