Breaking News

भावना गवळी यांची नाराजी दूर, प्रचारात उतरणार

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्यावर सध्या ईडीची टांगती तलवार असून १८ व्या लोकसभा निवडणूकीत या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्याचे भाजपा आणि शिवसेना पक्षाने टाळले. या पार्श्वभूमीवर भावना गवळी यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर, विद्यमान उद्योग मंत्री उदय सामंत आणि यांच्यासह अनेक नेते आणि मंत्र्यांनी भावना गवळी यांची भेट घेतली. त्यातच त्यांच्या मतदारसंघातून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी शिवसेना शिंदे गटाने जाहिर केली. त्यामुळे भावना गवळी या भूमिका घेणार याबाबत विविध तर्ग-वितर्क लढविले जात होते. शेवटी आज भावना गवळी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलताना भावना गवळी म्हणाल्या की, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड राहिला असून आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला.

मागील २५ वर्ष या मतदार संघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनता शिवसेना उमेदवाराला पुन्हा विजयी करेल. आपण नाराज नसून महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी होणार असल्याचेही भावना गवळी यांनी स्पष्ट केले.

भावना गवळी पुढे बोलताना म्हणाल्या की, वर्धा-नांदेड-यवतमाळ या रेल्वेमार्गाला गती देणे, जमीन अधिग्रहणाचा विषय पीएम पोर्टलवर समाविष्ट करण्यासाठी सात वर्ष पाठपुरावा केला. आपल्या पाठपुराव्यामुळे शकुंतला रेल्वे पुन्हा सुरु करण्यासाठी राज्याने अर्धा हिस्सा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. तसेच वाशिम, पुसद, माहूर आणि आदिलाबादला ५० टक्के निधी उपलब्ध करुन दिला. वाशिममध्ये ११ बॅरेजस दिल्याने सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. त्याचबरोबर वाशिममध्ये तीन नवीन बॅरेजसला मान्यता मिळाली आहे. याशिवाय जिल्ह्यात डीग्री कॉलेज, केंद्रीय विद्यालय, सुपर स्पेशालिटीसाठी १५० कोटींचा निधी उपलब्ध केला, असेही यावेळी सांगितले.

महायुतीच्या प्रचारात दिसत नसल्याने मी नाराज असल्याचे बोलले जाते, त्यावर भावना गवळी म्हणाल्या की मी नाराज होणाऱ्यांपैकी नाही. २५ वर्ष लोकांसाठी काम केले आहे. जनतेने टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. वडीलांपासून शिवसेनेसाठी काम केले आहे. संघर्ष करणारा व्यक्ती कधी नाराज होत नाही तो आत्मचिंतन करतो. त्यामुळे मी नाराज नसून राजश्री पाटील यांच्या प्रचारात काम करणार असल्याचेही सांगितले.

शेवटी बोलताना भावना गवळी म्हणाल्या की, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ४०० पारचा नारा पूर्ण करायचा आहे. तसेच राज्यासाठी अहोरात्र काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी यापुढे पक्षाचे अधिक जोमाने काम करणार आहे. राजश्री पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याने पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असतो. शिवसेना पक्षात विद्यार्थीदशेपासून काम करत असून यापुढे काम करत राहणार, असेही यावेळी बोलताना सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *