Breaking News

लवकरच ३ हजार ११० तलाठी भरती ५१८ मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार

गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठयाकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना विलंब व्हायचा आणि महसूल यंत्रणेवर ताण येत होता. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता. येत्या काही दिवसांमध्ये तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. ३ हजार ११० तलाठी आणि ५१८ मंडळ‍ अधिकारी असे एकूण ३ हजार ६२८ पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.

गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी याच्याशी संबंध येत असतो. सातबारा, विविध दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. तलाठी हे पद ग्रामीण भागात अत्यंत महत्वाचे असते. आता होणाऱ्या तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विहीत केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडून महसूली विभागनिहाय प्राप्त माहितीस अनुसरुन वाटप करण्यात आलेल्या ३ हजार ११० साझे आणि ५१८ महसूली मंडळ कार्यालयासाठी ३ हजार ११० तलाठी भरती आणि ५१८ मंडळ अधिकारी यांची पदोन्नती असे एकूण ३ हजार ६२८ पदे निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय ७ डिसेंबर २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

पुणे महसूली विभागाअंतर्गत एकूण ६०२ तलाठी साझे आणि १०० महसूली मंडळे आहेत. अमरावती महसूली विभागाअंतर्गत एकूण १०६ तलाठी साझे आणि १८ महसूली मंडळे आहेत. नागपूर महसूली विभागाअंतर्गत एकूण ४७८ तलाठी साझे आणि ८० महसूली मंडळे आहेत. औरंगाबाद महसूली विभागाअंतर्गत एकूण ६८५ तलाठी साझे आणि ११४ महसूली मंडळे आहेत. नाशिक महसूली विभागाअंतर्गत एकूण ६८९ तलाठी साझे आणि ११५ महसूली मंडळे आहेत. कोकण महसूली विभागाअंतर्गत एकूण ५५० तलाठी साझे आणि ९१ महसूली मंडळे आहेत.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *