कासगंज रस्त्याने गंगा नदीत आंघोंळ करण्यासाठी ३० ते ४० जणांना घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीने निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा तोल जाऊन झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला. तर १५ ते २० जण जखमी झाले. मृतकांमध्ये ७ लहान मुलांसह ८ महिलांचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदरचा अपघात एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर ट्रॉलीचा तोल जाऊन झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदरची ही घटना उत्तर प्रदेशातील कासगंज रस्त्यावरील दरियावगंज-पतियाली रस्त्यावरील पतियाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत सदरची घटना आज सकाळी घडली.
सदर ट्रॅक्टर ट्रॉलीत १५ ते २० नागरिक होते. यात १५ जण प्रौढ तर ७ लहान मुलांचा समावेश होता. परंतु तलावाजवळून जाताना ट्रॅक्टर ट्रॉली व्यक्तींच्या वजनाने आणि पुढील वाहनाला ओव्हरटेक करताना एका बाजूला कलल्याने ७ ते ८ फुट खोल असलेल्या तलावात थेट कोसळून ट्रॉलीतील १५ जणांचा यात ७ लहान मुले आणि ८ महिलांचा मृत्यू झाला तर आणखी १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
तसेच टॅक्टर ट्रॉलीने एकूण २० ते ३० जण यात ८ महिला आणि ७ मुलं प्रवास करत होती. तसेच १५ ते २० व्यक्ती जखमी झाली असून जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
सदर अपघातातील प्रवासी हे इटावा जिल्ह्यातील जयथारा येथून गंगा नदीत आंघोळ करण्यासाठी निघाले होते. रस्त्यात समोरून येणाऱ्या वाहनाला ओव्हर टेक करताना सदरचा अपघात झाला आहे. तसेच संबधित मृतांच्या शवविच्छेदन झाल्यानंतर मृतकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सदर दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रूपयांची तर जखमींना ५० हजाराची मदत जाहिर केली असून सदर घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींबद्दल सहवेदना व्यक्त केल्या.
जनपद कासगंज में सड़क दुर्घटना में हुई जनहानि अत्यंत हृदय विदारक है। मेरी संवेदनाएं शोकाकुल परिजनों के साथ हैं।
जिला प्रशासन के अधिकारियों को सभी घायलों के समुचित निःशुल्क उपचार हेतु निर्देश दिए हैं।
प्रभु श्री राम से प्रार्थना है कि दिवंगत आत्माओं को शांति तथा घायलों को शीघ्र…
— Yogi Adityanath (मोदी का परिवार) (@myogiadityanath) February 24, 2024