Breaking News

Tag Archives: bjp

महामोर्चात उध्दव ठाकरेंचा इशारा, ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर… बाळासाहेबांची शिकवण घेऊन जाऊ म्हणणारे तोतया

महाविकास आघाडीचा महामोर्चा सीएसटी येथे पोहोचल्यानंतर झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल, भाजपा आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. जेव्हा ह्या मोर्चाची घोषणा केली, तेव्हा मला काही जणांनी विचारलं तुम्ही चालणार का? मी एकटा नाही, …

Read More »

भाजपा म्हणते, राजकिय अस्तित्वाच्या संकटामुळे मविआचा महामोर्चा भारताच्या सामर्थ्यामुळे हताश पाकिस्तानचे मोदीजींविषयी वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सामर्थ्यशाली झाला आहे. पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करू शकत नाही तसेच भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची भारताची ताकद आहे. यामुळे हताश पाकिस्तानकडून मोदीजींविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पुणे येथे केली. पाकिस्तानचे …

Read More »

संजय राऊत यांचे टीकास्त्र, त्यांची ताकद फक्त वागळे इस्टेट आणि पाचपाखडी पुरतीच.. त्यांच्या डोक्यात गांडूळाचा मेंदू नुसता वळवळत असतो

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी-देवता आणि संतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली आहे. या विधानाचा निषेध नोंदविण्यासाठी वारकरी संप्रदायाकडून आज १७ डिसेंबर रोजी ठाणे बंदची हाक दिली. या बंदला बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा, अखिल हिंदू समाज आणि हिंदूत्वादी संघटनांनी पाठींबा देऊ केला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, निवडक पध्दतीने दिलगिरी व्यक्त केली जातेय सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या पक्षाला झालं तरी काय

महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढला जात आहे. तर दुसरीकडे या मोर्चाला उत्तर म्हणून भाजपाकडून माफी मांगो आंदोलन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय वातावरण तापलं आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया …

Read More »

आता चित्रा वाघ यांची मागणी, राज्यात लव्ह जिहाद कायदा यायलाच पाहिजे सुषमा अंधारे, संजय राऊत यांनी माफी मागावी

मागील काही महिन्यांपासून आंतरधर्मिय विवाह केलेल्या जोडप्यांमधील एकाची हत्या झाल्याच्या काही घटना उघडकीस आल्या. त्यानंतर भाजपा आमदार नीतेश राणे, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्या घटनांना लव्ह जिहादचा रंग देण्याचा प्रयत्न करत महाराष्ट्रातही या पध्दतीचा कायदा करण्याची मागणी केली. त्यावर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

बच्चू कडू म्हणाले, …रट्टा दिला पाहिजे, बदली म्हणजे ते घरीच जातील राज्यपालांसह भाजपा नेत्यावर साधला निशाणा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये, महाराष्ट्रातून अन्य राज्यात पळविले जाणारे प्रकल्प यांसह अनेक मुद्दय़ांवर महाविकास आघाडीतर्फे उद्या मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनीही या मोर्चासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान या मोर्चावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बच्चू …

Read More »

संजय राऊत म्हणाले, त्यांच्या डोक्यात नेमके कोणते किडे वळवळतायत आघाडीच्या मोर्चात महाराष्ट्र प्रेमींनी सहभागी व्हावे

महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी १७ डिसेंबर रोजी मुंबईत महामोर्चा काढला जात आहे. भाजपाची काही नेतेमंडळी आणि खुद्द राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले वक्तव्य, बसवराज बोम्मईंची आक्रमक भूमिका आणि महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जाणारे उद्योग यावरून सरकारविरोधी भावना व्यक्त होत आहे. त्यातच राज्यातील उद्योग गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न आणि महागाईच्या मुद्यावरही या …

Read More »

नाना पटोलेंचा पलटवार, प्रभूरामाच्या नावावर स्वतःचे खिशे भरणाऱ्यांनी हिंदू देवदेवतांवर बोलू नये भाजपाचे आंदोलन म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’

महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र विकास आघाडीच्या १७ तारखेच्या हल्लाबोल मोर्चाने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. जनतेत असलेला संताप या मोर्चातून व्यक्त होत असल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोर्चाच्या विरोधात आंदोलन काढण्याची नौटंकी भाजपा करत आहे. महापुरुषांचा सातत्याने अपमान करणाऱ्या भाजपाच्या वाचाळविरांविरोधात मूग मिळून गप्प बसणारे आता मात्र महापुरुष व …

Read More »

महाविकास आघाडीच्या मोर्चाला भाजपाकडून उद्या “माफी मांगो”चे प्रत्युत्तर भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा

उद्धवजींच्या सेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची वक्तव्ये सध्या समाजमाध्यमांवर येत आहेत. त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांचा अपमान, प्रभू श्रीकृष्णाचा उपमर्द, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची खिल्ली, संतश्रेष्ठ एकनाथांची चेष्टा आणि वारकरी संप्रदायांचा अपमान हा महाराष्ट्र द्रोह नाही का? असा उद्धवजींना माझा प्रश्न आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान करणे, हिंदू मनाला इजा पोहोचली जाईल, अशी वक्तव्ये …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन, भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही कोस्टल रोडवरील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर दुप्पट करण्याचा निर्णय

विकासकामे करताना भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे. मुंबईतील कोस्टल रोडचे काम करताना वरळी कोळीवाड्याजवळील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर ६० वरून १२० मीटर करण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. या भागातील कोळीबांधवांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून अत्याधुनिक तंत्रज्ञान, मनुष्यबळाची संख्या वाढवून कोस्टल रोड प्रकल्प …

Read More »