Breaking News

संसद सुरक्षा प्रश्नी चर्चेची मागणी करणारे विरोधी पक्षाचे ७८ खासदार निलंबित

१३ डिसेंबर रोजी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकूण सहा तरूणांपैकी दोन तरूणांनी लोकसभेत उड्या टाकत धूर फवारणी केली. तर बाकीच्या चार जणांनी संसदेच्या आवारात घोषणा देत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संसद सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. दोन दिवस आधी याप्रश्नी चर्चेची मागणी करणाऱ्या राज्यसभा आणि लोकसभेतील १५ विरोधी बाकावरील खासदारांवर निलंबनाची कारवाई कऱण्यात आली. तर आज लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा विरोधकांनी संसद सुरक्षेच्या प्रश्नावर केंद्र सरकारकडे चर्चेची मागणी केली.

परंतु लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चर्चेची मागणी फेटाळून लावत विरोधी पक्षाच्या सदस्यांना बाकावर जाऊन बसण्याची सूचना केली. परंतु विरोधकांनी चर्चेची मागणी तशीच पुढे केली. त्यामुळे विरोधी बाकावरील ३० खासदारांवर निलंबनाची कारवाई केली. तर ३ जणांवर हक्कभंग समितीच्या शिफारसींतर्गंत निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर राज्यसभेतही याच मुद्यावरून सुरक्षेच्या मुद्यावरून चर्चेची मागणी करणाऱ्या ४५ खासदारांवर निलंबनाची कारवाई कऱण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

यातील ३४ खासदारांवर हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. तर ११ खासदारांवर हक्कभंग समितीचा अहवाल येई पर्यंत निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे आज दिवसभरात ७८ खासदारांना सुरक्षेची मागणी प्रश्नी संसदेत चर्चेची मागणी केल्याने निलंबित करण्यात आले.

तसेच राज्य सभा आणि लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांनी संसद सुरक्षा प्रकरणी चर्चेची मागणी करणारे २६७ अन्वये खाली एकूण २२ स्थगन प्रस्ताव सादर करत चर्चेची मागणी केली होती. परंतु प्रत्येक प्रस्ताव केंद्र सरकारकडून फेटाळण्यात आला.

सकाळी राज्यसभा आणि लोकसभेच्या नियमित कामकाजाला सुरुवात झाली. मात्र संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तर सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी कामकाज चालवायचेच असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत चालेल अशी शक्यता वाटत नव्हती. विरोधकांच्या गोंधळामुळे अखेर चारच्या सुमारास राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.

तर लोकसभेत विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे दुपारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Check Also

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *