मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर कोरोनाची बाधा विद्यार्थ्यांना होवू नये या उद्देशाने या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार राज्यातील १ लाख ८६ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १६४३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
राज्यात ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग असलेल्या २५ हजार ८६६ शाळा असून या शाळांमध्ये ५९ लाख २७ हजार ४५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर २ लाख ७५ हजार ४७० शिक्षक कार्यरत आहेत. ९६ हजार ६६६ शिक्षकेतर कर्मचारी काम करत आहेत. राज्यातील एकूण २५ हजार ८६६ शाळांपैकी ९ हजार १२७ शाळा सुरु झालेल्या आहेत. तर शाळांमध्ये २ लाख ९९ हजार १९३ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावल्याचेही त्यांनी सांगितले.
Tags cm uddhav thackeray maharashtra school started from 23 November schools started varsha gaikwad
Check Also
संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही
आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …