Breaking News

राजकारण

जयंत पाटील खोचक टोला, मग हा ईश्वरीय संकेत गुजरातला मिळाला…

काही दिवसांपूर्वी गुजरात मधील मच्छु नदीवरील झुलता पूल नव्याने उद्घाटन केल्यानंतर कोसळून १४१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अशा दुर्घटनांवरून राजकारण काँग्रेस करू इच्छित नाही असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. तसेच इतर राजकिय पक्षांनीही याबाबत समंज्यसपणा दाखविला. मात्र सोशल मिडीयावर पश्चिम बंगालमध्ये पूल कोसळल्यानंतर पंतप्रधान …

Read More »

केंद्रीय शिक्षण विभागाच्या प्रतवारीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी निर्देशांकात (Performance Grading Index- PGI) एकूण एक हजार गुणांकनापैकी ९२८ गुण मिळवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. २०१९ च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये ५९ गुणांची वाढ झाली असून भौतिक संसाधने व सुविधा (Infrastructure facilities) व शासकीय प्रक्रिया (Governance Processes) या दोन क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झाली …

Read More »

देशावरील ५४ लाख कोटीचे कर्ज १४० लाख कोटींवर वर्तमानातील सर्वाधिक कमकुवत पक्ष नरेंद्र मोदी आणि भाजपा-पत्रकार अशोक वानखेडेंचा दावा

देश स्वतंत्र झाल्यानंतर २०१४ पर्यंत देशावर ५४ लाख कोटी कर्ज होते. ते एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४० लाख कोटी केले. हे सरकार केवळ आकड्यांचा जुगाड करून सत्य लपवत आहे. सध्याच्या वर्तमानातील सर्वाधिक कमकुवत पक्ष कोण असेल तर नरेंद्र मोदी आणि भाजपा पक्ष आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी जिंकलेल्या जागांचा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझी पंतप्रधान मोदींशी चर्चा झालीय…चिंता करू नका राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध

‘शासन राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाला आणि महाराष्ट्राला विकासात सर्वोच्च स्थानी नेणार’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सांताक्रुझ परिसरातील हॅाटेल ग्रॅंड हयात येथे आयोजित ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’ मध्ये कार्यकारी संपादक साहिल जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज्य शासनाच्या विकासात्मक प्रकल्पांची माहिती देतांना मुख्यमंत्री शिंदे …

Read More »

अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका, …तेच घर उध्वस्त करणे म्हणजे बेईमानी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठे प्रकल्प बाहेर गेले त्यातून लाखो नोकर्‍या तरुणांना गमवाव्या लागल्या आहेत...

सत्तेवर आल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत. त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. जे पक्ष सोडून गेले ते आज अस्वस्थ आहेत तसे ते बोलून दाखवत आहेत. ज्या घरात वाढलो तेच घर उध्वस्त करणे ही बेईमानी जनतेला पटलेली नाही. शिवसेना नाव आणि त्यांचे चिन्ह गोठवले तेही जनतेला रुचले नाही. …

Read More »

बा… विठ्ठला, शेतकरी-कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर !

“गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा”, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस व सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते …

Read More »

जयंत पाटील म्हणतात, राष्ट्रवादीवर जेव्हा टीका होते याचा अर्थ पक्ष बलशाली

आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो, ही भीती असल्याने सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टिका होत आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराला आजपासून शिर्डीत सुरुवात झाली. या शिबीराच्या …

Read More »

भाजपा म्हणते, खोटं सांगाल तर रस्त्यावर उतरून विरोध करू

महविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे सत्तेच्या काळात काहीच काम केले नाही आणि आता भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना युती सरकार काम करत असताना आघाडीतील घटक पक्ष खोटा नॅरेटीव्ह चालवून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पेरत आहेत व युती सरकारची प्रतिमा खराब करत आहेत, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी …

Read More »

अरविंद सावंत यांची खोचक टीका, घोषणा ७५ हजाराची आणि नियुक्ती पत्रे दोन हजार

मागील तीन महिन्यात राज्यातून तीन मोठे गुंतवणूकीचे प्रकल्प महाराष्ट्रातून पळवून नेले. तर दुसऱ्याबाजूला राज्यातील बेरोजगारांना शासकिय नोकरी देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यावरून उध्दव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आज शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, भाजपाने टोळीबरोबर आघाडी केलीय राष्ट्रवादी मंथन... वेध भविष्याचा' या टॅगलाईनखाली राष्ट्रवादीचे शिर्डीत ४ - ५ नोव्हेंबरला शिबीर...

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यांची दिवाळी दुःखात गेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे होते, त्यांना दिलासा द्यायला हवा होता. मात्र तसे होताना दिसले नाही. सरकारमध्ये गतीमानता दिसत नाही हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत …

Read More »