आगामी लोकसभा निवडणूकीच्या धर्तीवर आणि भाजपा विभाजनवादी राजकारणाला प्रत्युत्तर म्हणून देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यातून काँग्रेसच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले. त्यातच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीतून काढता पाय घेतला. तर पश्चिम बंगालच्या प्रमुख तृणमूल काँग्रेसनेही आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर आज रविवारी काँग्रेस पक्षासोबत निवडणूकपूर्व जागा वाटपाच्या चर्चांना पूर्णविराम देत तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) रविवारी पश्चिम बंगालमधील सर्व ४२ लोकसभा जागांसाठी उमेदवार जाहीर केले. ममता बँनर्जी यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसला आर्श्चयाचा धक्का बसला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या जाहिर केलेल्या ४२ उमेदवारांच्या यादीत बर्हामपूर येथील माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण आणि वर्धमान दुर्गापूर लोकसभा मतदारसंघातील कीर्ती आझाद यांना उमेदवारी देत सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का दिला. विशेष म्हणजे पक्षाने दिग्गज खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली असून यात कोलकाता येथील सुदीप बॅनर्जी आणि दमदम लोकसभा मतदारसंघातून सौगता रॉय आणि सेरामपूरमधून कल्याण बॅनर्जी यांचा समावेश आहे.
पक्षाने नुसरत जहाँला बसीरहाटमधून (संदेशखाली ज्या मतदारसंघात येतो) वगळले होते, त्यांनी लोकप्रिय बंगाली अभिनेत्री रचना बॅनर्जी यांना हुगळी आणि जून मलिया यांना मेदिनीपूरमधून उमेदवारी दिली आहे. तसेच, टीएमसीने वगळलेल्यांमध्ये बराकपूरचे खासदार अर्जुन सिंह आहेत, ज्यांनी २०१९ च्या निवडणुका भाजपाच्या तिकिटावर जिंकल्या होत्या परंतु नंतर ते टीएमसीमध्ये परतले.
२०२१ मध्ये आसनसोल पोटनिवडणुकीत विजयी झालेले शत्रुघ्न सिन्हा आसनसोलमधून रिंगणात उतरले आहेत. तृणमूल काँग्रेसने तमलूकमधील युवा नेते देबांगशु भट्टाचार्य आणि मालदा उत्तर येथील भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी प्रसून बॅनर्जी यांच्यासह नवीन चेहऱ्यांवर विश्वास ठेवला आहे. बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच सेवेचा राजीनामा दिला होता.
महिला खासदारांमध्ये तृणमूल काँग्रेसने कृष्णनगरमधून महुआ मोईत्रा आणि बारासातमधून काकोली घोष दस्तीदार यांना उमेदवारी दिली आहे. मिमी चक्रवर्तीच्या जागी तृणमूलचे युवा नेते सयानी घोष यांना जाधवपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बरमधून उमेदवारी मागणार आहेत.
२०२१ मध्ये भाजपच्या तिकिटावर विजयी झालेले आणि नंतर तृणमूलमध्ये गेलेले भाजपाचे दोन आमदार, कृष्णा कायलानी आणि मुकुटमणी अधिकारी यांना अनुक्रमे उत्तर बंगालमधील रायगंज आणि दक्षिण बंगालमधील राणाघाट येथून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी कोलकात्याच्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर पक्षाच्या जॉन गोर्जन सभेत (पीपल्स रोअर रॅली) लोकसभा उमेदवारांची ओळख करून दिली.
तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष ममता बँनर्जी म्हणाले, ज्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळू शकले नाही किंवा पक्षाच्या पदांवर आम्ही सामावून घेऊ. तृणमूल काँग्रेस आसाम आणि मेघालयमध्ये उमेदवार उभे करेल आणि उत्तर प्रदेशमध्ये उमेदवार उभे करण्यासाठी समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशीही चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले.
Under the leadership of our Chairperson Smt. @MamataOfficial , the #JonogorjonSabha has demonstrated that Bengal refuses to compromise; Bengal refuses to back down.
Today, Bengal has roared against every injustice inflicted upon its people. The sins of the @BJP4India-led Centre… pic.twitter.com/Nr0GwL3MnZ— All India Trinamool Congress (@AITCofficial) March 10, 2024
लोकसभा निवडणुकीसाठी टीएमसीने उमेदवारांची “एकतर्फी घोषणा” केल्याबद्दल काँग्रेस नेतृत्वाने प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये TMC सोबत जागा वाटप करार करण्याची इच्छा वारंवार जाहीर केली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नेहमीच असे मानले आहे की अशा कराराला वाटाघाटीद्वारे अंतिम रूप द्यावे लागते, एकतर्फी घोषणांनी नव्हे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची नेहमीच इच्छा आहे की इंडिया आघाडीने एकत्र येऊन भाजपाशी लढावे, असे मत व्ययक्त केली.
युसूफ पठाण यांना बहरामपूरमधून उमेदवारी दिल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले की, मतदारसंघातील मुस्लिम मतांमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न होता. जर तृणमूलला युसूफ पठाणचा सन्मान करायचा असेल तर ते भारत आघाडीला गुजरातमधून उमेदवारी देण्यास किंवा राज्यसभेवर उमेदवारी देण्यास सांगू शकले असते. तृणमूलला बहरामपूरमधून मुस्लिम मतांचे विभाजन करायचे आहे, म्हणूनच त्यांनी येथून युसूफ पठाण यांना उमेदवारी दिली आहे, अशी टीकाही केली.
युसूफ पठाण यांची उमेदवारी अशा वेळी आली आहे जेव्हा भाजपा बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून एका क्रिकेटपटूला उमेदवारी देऊ शकते अशी अटकळ बांधण्यात येत आहे.
ब्रिगेड परेड मैदानावरील मेळाव्याला संबोधित करताना, ममता बॅनर्जी यांनी राज्याला निधी नाकारल्याचा मुद्दा उपस्थित करून आगामी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा निश्चित केला.
Bengal's #JonogorjonSabha reaffirms the faith of people in the leadership of Smt. @MamataOfficial!@iamyusufpathan from Berhampore, shall stand with the people of Bengal and win the mandate against the jomidari of @BJP4India! pic.twitter.com/XHeicr6B8b
— All India Trinamool Congress (@AITCofficial) March 10, 2024
ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मोदीची हमी’ या प्रचाराच्या पिचचाही उल्लेख केला. “कसली हमी? त्याचे मूल्य नाही, अशी टीका करत पुढे म्हणाल्या की, भाजपा सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत ₹१०० ने कमी केली आहे आणि निवडणुकीनंतर [ते] किंमत ₹१,००० ने वाढवतील,” असा आरोप केला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या मजुरी म्हणून देण्यात आलेला निधी पळवल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी फेटाळून लावताना म्हणाल्या की, दोन वर्षांपासून निधी जारी झाला नव्हता त्यामुळे त्यांच्या गैरवापराचा प्रश्नच उद्भवत शकत नाही.
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बँनर्जी पुढे म्हणाल्या की, निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या नुकत्याच दिलेल्या राजीनाम्याचा मुद्दाही उपस्थित केला. मी सर्वप्रथम निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याबद्दल बोलणार आहे. त्यांनी बंगालवर बळजबरीने ताबा घेण्याचा कसा प्रयत्न केला हे बातम्यांच्या अहवालातून दिसून आले आणि त्यांनी मात्र निवडणूक आयुक्त हे मान्य केले नाही. या सभेतून आम्ही त्यांना सलाम करतो. निवडणूक आयोगाच्या नावाने, ते ECI च्या प्रतिष्ठेला कलंक आहेत, भाजपा सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, असा आरोपही केला.