Breaking News

Tag Archives: chief minister

राजनाथ सिंग यांची टीका, इंडिया म्हणजे नाव मोठे लक्षण खोटे…. देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान

भाजपाचे वजनदार मंत्री आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे वडील डॉ विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या नावे देण्यात येत असलेल्या साहित्य व कला पुरस्कारांचे वितरण देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाषण करताना मुंबईत विरोधाच्या होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका करताना …

Read More »

नाना पटोले यांची माहिती ‘इंडिया’च्या पाहुण्यांसाठी हे खास खाद्यपदार्थ यात… देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम; एकनाथ शिंदे फक्त चेहरा

राज्यातील तिघाडी सरकारमध्ये अंतर्विरोध आहे हे स्पष्ट झाले आहे. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्यात अधिकारपदावरून स्पर्धा सुरु आहे. अजित पवार यांच्या दादागिरीचा अनुभव मविआ सरकारने पाहिला आहे पण सध्या त्यांच्या दादागिरीला चाप लावला आहे. राज्यातील सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ चेहरा आहेत आणि खरे मुख्यमंत्री ‘सुपर सीएम’ हे …

Read More »

आधी फाईली माझ्याकडं अन् नंतर मुख्यमंत्र्यांकडं अजित पवार यांचा वाढता हस्तक्षेप

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून बैठकींचा धडाकाल लावला आहे. तसेच त्यांचा प्रशासकीय कामाजात वाढता हस्तक्षेप पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांकडून येणाऱ्या सर्व फाईल प्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तपासल्या जातील. यानंतर मुख्यमंत्र्यांकडे येतील,असा …

Read More »

राज्यात १ हजार ४९९ नवी महाविद्यालये सुरु होणारः मुख्यमंत्र्यांची मान्यता नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता

राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत् आराखड्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या (माहेड) बैठकीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यानुसार यावर्षी राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी …

Read More »

जयंत पाटील यांचा इशारा,…संकट उग्र होण्याची भीती शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दिले पत्र

राज्यात पावसाने दडी मारल्याने राज्यासमोर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. या परिस्थितीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यात शेतकरी आत्महत्येसारखे संकट उग्र होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या पत्रात म्हटले की, राज्यात ऑगस्ट …

Read More »

‘सलाम मुंबई’ कार्यक्रमाचे भारतीय लष्कराकडून आयोजन नेटके नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

भारतीय लष्कराच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘सलाम मुंबई’ कार्यक्रम मोठ्या संख्येने नागरिकांना पाहता यावा यासाठी नेटके नियोजन केले जाईल. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि मुंबईतील सर्व यंत्रणा सहकार्य करतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. ‘सलाम मुंबई’ या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत लेफ्टनंट जनरल एच. एस. काहलों यांनी मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची बैठक

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. नॅशनल वेटलँड ॲटलसनुसार राज्यात असलेल्या सुमारे २३ हजार पाणथळ जागांचे सर्व्हेक्षण केंद्र शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून करावे. त्याबाबतचे अहवाल वर्षभरात प्राधिकरणासमोर ठेवण्यात यावेत असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह …

Read More »

आंदोलनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन अप्पर वर्धा बाधितांच्या मागण्यांबाबत १५ दिवसांत बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रसारमाध्यमांशी बोलताना आश्वासन

अप्पर वर्धा प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसन व अनुषंगिक मागण्यांबाबत येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यासाठी या बाधित गावातील जमीन, पुनर्वसनाचे पर्याय यांबाबत सर्वंकष आढावा घेऊन माहिती तयार करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. प्रकल्प बाधितांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा बैठकीत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा निर्णयः नीति आयोगाच्या मदतीने मुंबईचा आर्थिक कायापालट मास्टर प्लॅन सादर करणार, राज्यातर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम, नोडल अधिकारी नेमणार

मुंबई महानगर प्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास व्हावा आणि या भागाचा जीडीपी ३०० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासंदर्भात नीती आयोगासमवेत आज बैठक झाली. राज्य शासन यामध्ये नीति आयोगाशी संपूर्ण समन्वय ठेवेल, वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र टीम यासाठी नेमण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आज मंत्रालयात नीति …

Read More »

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे मंत्रालयात अनोखे आंदोलन (व्हिडिओ) ५-६ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर चढून हल्लाबोल आंदोलन केले. ऐनवेळी आंदोलनकर्त्यांनी मंत्रालयातच आंदोलन सुरु केल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर पोलिसांनी सुरक्षा जाळीवर चढत ५ ते ६ आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान आंदोलकांनी मंत्रालयातील जाळीवर उड्या टाकून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी …

Read More »