मुंबई महानगर प्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास व्हावा आणि या भागाचा जीडीपी ३०० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासंदर्भात नीती आयोगासमवेत आज बैठक झाली. राज्य शासन यामध्ये नीति आयोगाशी संपूर्ण समन्वय ठेवेल, वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र टीम यासाठी नेमण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आज मंत्रालयात नीति …
Read More »सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे मंत्रालयात अनोखे आंदोलन (व्हिडिओ) ५-६ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर चढून हल्लाबोल आंदोलन केले. ऐनवेळी आंदोलनकर्त्यांनी मंत्रालयातच आंदोलन सुरु केल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर पोलिसांनी सुरक्षा जाळीवर चढत ५ ते ६ आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान आंदोलकांनी मंत्रालयातील जाळीवर उड्या टाकून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी …
Read More »मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि दुष्काळग्रस्त भागातील प्रकल्पांना मदत द्या गांधीनगर येथील पश्चिम क्षेत्रिय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी
दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज अहमदाबाद येथील गांधीनगर येथे पश्चिम …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे टीकास्त्र, आम्ही असा काही करंट दिला की…. शासन आपल्या दारी कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्यावर केली टीका
परभणी जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हणाले की, देश चंद्रावर जात आहे. मात्र काहीजण घरात बसून राज्य चालवित होते असा उपरोधिक टोला …
Read More »पैलवानांच्या आरोग्य विम्यासाठी रूस्तुम -ए-हिंद अमोल बुचडे यांचा पुढाकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत केली आरोग्य विम्याची मागणी
महाराष्ट्रात शहरापासून गाव – खेड्यापर्यंत कुस्ती हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. यामध्ये प्रामुख्याने फ्री स्टाईल, ग्रीको रोमन, पारंपारिक मातीतील कुस्ती, महिला कुस्ती आणि सुमो कुस्ती अशा वेगवेगळ्या प्रकारात शालेय कुस्ती स्पर्धा, अनेकविध खेळ संघटना आयोजित कुस्ती स्पर्धा, निमंत्रित कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी सारखी वरिष्ठ गटातील मानाची स्पर्धा यामध्ये मोठ्या …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचे केंद्र सरकारला पत्र, कांदाप्रश्नी केली ही मागणी मुख्यमंत्री कार्यालयाने दिली माहिती
राज्यात कांदा प्रश्नावरून तापलेले वातावरण शांत करण्यासाठी दिल्लीतील मोदी सरकारच्या आदेशान्वये महाराष्ट्रातल शेतकऱ्यांचा किमान २ मेट्रिक टन कांदा नाफेड मार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत जाहिर केला. मात्र तरीही शेतकऱी संघटनेच्या नेत्यांनी आणि शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले नाही. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री …
Read More »या राजकिय नेत्यांनी वाहिली सीमा देव यांना श्रध्दांजली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना आदरांजली
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे. चतुरस्त्र अभिनेत्री हरपली- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे “चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन चटका लावून …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा, …गद्दारांना गाडायचेय शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचा ठाकरे गटात प्रवेश
शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकाविल्यानंतर मुळ शिवसेनेतून अनेक आमदार-खासदार आणि इतर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. या बाहेर पडणाऱ्यांमध्ये शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे हे ही होते. मात्र वाघचौरे यांनी झालेली चुक दुरूस्त करत पुन्हा उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, …
Read More »कांदा प्रश्नावरून बच्चू कडू यांचा प्रहार, हे नामर्दाचं सरकार…फक्त ग्राहकांचा विचार करणार केवळ सत्ता टीकविण्यासाठी हे सगळं
नुकतेच राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेल्या दादा भुसे यांनी कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही असे वक्तव्य करत जर कांदा महाग झालाय असं वाटत असेल तर खावू नका असे सांगत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. त्यातच शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केलेल्या ४० टक्के शुल्कावरून राज्यात राजकिय …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश, चारा उत्पादनासाठी डीपीडीसीतून निधी धरणातील पाणीसाठ्यानुसार जिल्हा प्रशासनाने काटकसरीने नियोजन करावे
राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्याचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. स्थानिक परिस्थितीनुसार धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी …
Read More »