Breaking News

Tag Archives: कांदा

छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, नाशिकच्या जागेवर चर्चेनंतर लवकरच निर्णय…

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार हे अजित पवार गटाचे आहे. त्यामुळे नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आपलाही दावा कायम आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चेनंतर कोण उमेदवार असेल ते ठरविले जाईल. कुठली जागा कुणाला मिळेल ते लवकरच कळेल पण महायुतीतील कुठल्याही पक्षाला संधी मिळाली. त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे. आगामी वर्ष हे निवडणुकांचे असून त्यादृष्टीने …

Read More »

कांदा पुन्हा रडवणार; दिल्लीमध्ये ८० रुपये किलोने विकला जातोय कांदा दिल्लीत किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे भाव भिडतायत गगनाला

दिवाळी जवळ आलेली असताना कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये कांद्याचे भाव झपाट्याने वाढत आहेत. दिल्लीच्या किरकोळ बाजारात कांद्याचा भाव ६५ रुपयांवरून ८० रुपये किलो झाला आहे. तर दिल्ली-एनसीआरमध्ये मदर डेअरी सारख्या सुमारे ४०० यशस्वी स्टोअर्समध्ये कांदा चढ्या भावाने विकला जात आहे. तसेच ई-कॉमर्स पोर्टल बिग बास्केट …

Read More »

कांदा प्रश्नी अनेकांचे आवाज मात्र बैठकीला फक्त सत्तार, गोयल आणि पवार कांदा उत्पादन, खरेदी-विक्री दराविषयी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही केंद्रीय वाणिज्य मंत्री, पियुष गोयल

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निर्यातीसाठी अतिरिक्त ४० टक्के शुल्क भरावे लागत आहे. मात्र देशांतर्गत आणि महाराष्ट्रात कांदा उत्पादनाचे दर पडलेले असल्याने शेतकऱ्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्यातील भाजपाप्रणित सरकारमधील मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारेमाप आश्वासन दिले. मात्र आज केंद्रीय …

Read More »

कांद्याचा वांदा वाढलाः अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही बैठक पार पडली पण निर्णय झाला नाही

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांवर केंद्र शासनाच्या सहकार्यातून मार्ग काढला जाईल, असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदाप्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीतूनच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना दूरध्वनी केला. पियुष गोयल यांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या दूरध्वनीला प्रतिसाद देत आजच संध्याकाळी (२६ सप्टेंबर) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे केंद्र सरकारला पत्र, कांदाप्रश्नी केली ही मागणी मुख्यमंत्री कार्यालयाने दिली माहिती

राज्यात कांदा प्रश्नावरून तापलेले वातावरण शांत करण्यासाठी दिल्लीतील मोदी सरकारच्या आदेशान्वये महाराष्ट्रातल शेतकऱ्यांचा किमान २ मेट्रिक टन कांदा नाफेड मार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत जाहिर केला. मात्र तरीही शेतकऱी संघटनेच्या नेत्यांनी आणि शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले नाही. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, नाफेडच्या दरातून कांद्याचा उत्पादन खर्च तरी निघतो का? कांद्याचे ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करत नाही तोपर्यंत संघर्ष सुरुच राहील

शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी भाजीपाल्यासह शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहे. शेतकऱ्याचे हे दुःख पाहून सरकारला पाझर फुटत नाही एवढे निर्दयी लोक सत्तेत बसले आहेत. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याने भाव पडले आणि सरकार आता नाफेड मार्फत केवळ २ लाख टन कांदा २४१० रुपयाने खरेदी करणार आहे. या भावात कांद्याचा …

Read More »

कांदा प्रश्नावरून बच्चू कडू यांचा प्रहार, हे नामर्दाचं सरकार…फक्त ग्राहकांचा विचार करणार केवळ सत्ता टीकविण्यासाठी हे सगळं

नुकतेच राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेल्या दादा भुसे यांनी कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही असे वक्तव्य करत जर कांदा महाग झालाय असं वाटत असेल तर खावू नका असे सांगत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. त्यातच शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केलेल्या ४० टक्के शुल्कावरून राज्यात राजकिय …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, नाफेडमार्फत २ लाख टन कांदा खरेदीचा निर्णय? केवळ धुळफेक मुख्यमंत्री बैठका घातायेत आणि उपमुख्यमंत्री जपानमधून निर्णयाची घोषणा करतात, सरकार नेमके कोण चालवतंय ?

केंद्र सरकारने अचानक कांद्याचे निर्यात शुल्क ४० टक्के केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत बाजार बंद पाडले. शेतकऱ्यांचा संताप पाहून राज्यातील तिघाडी सरकारने धावाधाव करत नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला. राज्यातील बाजारात मागील महिन्यात ११ लाख टन कांदा आला व या महिन्यात आतापर्यंत ६.५ लाख टन कांदा आला आहे …

Read More »

शिंदे गटाचा घरचा आहेर, कांद्यामुळे दिल्लीतील सरकार गेलं तर सरकारही हलतं त्यामुळे… शिंदे गटाच्या संजय शिरसाटांनी करून दिली काँग्रेस सरकारच्या काळातील गोष्टीची आठवण

काही वर्षापूर्वी दिल्लीतील राज्य सरकार आणि काँग्रेसचे सरकार कांद्याच्या वाढत्या किंमतीवरून सत्तेतून पाय उतार व्हावं लागले. तर कोरोना काळापासून देशासह राज्यातील जनतेला सातत्याने महागाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर तसेच कांद्याच्या प्रश्नावर देशातील जनता आणि शेतकरी यांचा रोष किती मोठा असतो याचे ढळढळीत उदाहरणच शिंदे गटाच्या आमदाराने मोदी सरकार …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार… अडचणीत असलेल्या प्रत्येकाच्या मागे सरकार खंबीरपणे उभे राहणार

मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात कमी पावसामुळे कांद्याचे दर वाढून त्याचा फटका सरकारला बसू नये म्हणून या उद्देशाने कांदा निर्यातीवर सरसकट ४० टक्क्याचा कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाच्या विरोधात राज्यातील विविध शेतकऱ्यांच्या संघटनांनी आणि शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरु केले. यापार्श्वभूमीवर राज्य …

Read More »