Breaking News

रामदास कदम म्हणाले, आम्हाला १०० टक्के विश्वास धनुष्यबाण नाही मिळाला तर विचार करून पुढील दिशा ठरवू

शिवसेना कोणाची यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार संघर्ष सुरू आहे. आज शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचं या प्रकरणावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. शिंदे आणि ठाकरे गटाने आपआपली बाजू मांडल्यानंतर आयोग आपला निर्णय देईल. मात्र, निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यास काय? यावर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली.
रामदास कदम म्हणाले, यांना माहिती नाही की, निवडणूक आयोग पक्षचिन्हाचा निर्णय घेताना एक आमदार निवडून यायला तीन तीन लाख मतदान असते आणि एक खासदार निवडून आणण्यासाठी २० लाखांचं मतदान असतं याचाही विचार करेल.
निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल, आम्ही त्याचं स्वागत करू. तसेच एकत्र बसून पुढील निर्णय घेऊ. मात्र, आम्हाला १०० टक्के विश्वास आहे की, धनुष्यबाण निश्चितपणे आम्हाला मिळेल. पूर्ण बहुमत आमच्याकडेच आहे असेही ते म्हणाले.
एक आमदार निवडून यायला तीन तीन लाख मतदान असते. एक खासदार निवडून आणण्यासाठी २० लाखांचं मतदान असतं. यांना अजून याची कल्पना नाही, यांना माहिती नाही की, हे सर्व यात गृहित धरलं जाईल. पक्षातील बहुमतावर बोलताना रामदास कदम म्हणाले, याआधीचे निवडणूक आयोगाचे निकाल पाहिले तर ज्याच्याकडे आमदार, खासदार, नगरसेवक, सभापती बहुमत आहे त्यांच्याच बाजूने निकाल येतो. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क आणि बीकेसी येथेही अधिक ताकद कुणाकडे आहे हे सिद्ध झालंय. लोकशाहीत ज्याच्याकडे अधिक संख्या त्यांना अधिक महत्त्व दिलं जातं असल्याचेही ते म्हणाले.
आमची शिवसेना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत धनुष्यबाण आम्हालाच मिळेल. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला वेळ लागणार नाही. यावर आजच निर्णय होईल, असा दवाही त्यांनी केला.

Check Also

नाना पटोले यांची घोषणा, विधान परिषदेची कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढवणार

आगामी विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार दिला जाईल. मागील काही महिन्यांपासून काँग्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *