Breaking News

राजकारण

पालकमंत्री, खाते वाटप रखडणार, १५ ऑगस्टला कोणता मंत्री कोठे झेंडा फडकाविणार? मुख्यमंत्री कार्यालयाकडून सर्वांना आदेश जारी

विरोधकांच्या सततच्या टीकेला घाबरून अखेर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने अखेर राज्य मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात २० जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. मात्र मंत्रिमंडळ विस्तार करूनही दोन दिवस होत आले तरी कोणाला कोणते खाते द्यायचे आणि कोणाला कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री नेमायचा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

राष्ट्रवादीचा सवाल, बाळासाहेबांचे दर्शन घेता मग डॉ. आंबेडकरांचे स्मारक लांब होते का… शिंदे गटाची बाळासाहेबांशी आस्था किती आणि लालसा किती हे राज्यातील जनतेला कळले आहे - महेश तपासे

ईडी सरकारमधील मंत्र्यांनी आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. हे दर्शन आस्थेपोटी घेतले असते तर त्यांनी शिवसेना फोडली नसती. शिवसेनेत बंड करायचे आणि आस्था आमची बाळासाहेबांशी आहे हे दाखवायचं यामध्ये आस्था किती आणि लालसा किती हे राज्यातील जनतेला कळून चुकलं आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य …

Read More »

काळ्या कपड्यातील आंदोलनावरील मोदींच्या टीकेला राहुल गांधी यांचे प्रत्युत्तर काळे कपडे दिसले देशातली महागाई, बेरोजगारी दिसत नाही का?

नुकतेच काही दिवसांपूर्वी महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून आंदोलन केले. या आंदोलनाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने कितीही काळी जादू करण्याचा प्रयत्न केला तरी जनतेच्या मनात ते विश्वास निर्माण करू शकत नाही अशी टीका …

Read More »

नाना पटोले म्हणाले, शिवसेनेने काँग्रेसशी चर्चा करायली हवी होती… शेतकऱ्यांना भरीव मदत द्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही

भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी २०१९ साली राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर स्थापन करण्यात आले होते. आता राज्यातील सत्तेची समिकरणे बदलली असली तरी महाविकास आघाडी म्हणून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबद्दल शिवसेनेने काँग्रेस पक्षाशी चर्चा करायला हवी होती. विरोधी पक्षनेते ठरवताना शिवसेनेने काँग्रेसशी …

Read More »

नव्या सरकारचे ९ दिवसांचे पावसाळी अधिवेशन, मात्र ३ दिवस सुट्टीचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून

राज्यातील नव्याने स्थानापन्न झालेल्या पण अद्यापही अस्थिरतेच्या भावनेने ग्रासलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथेप्रमाणे नियमित पावसाळी अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरविण्यासाठी आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत नव्या सरकारचे नऊ दिवसांचे पावसाळी अधिवेशन बोलाविले असून त्यातील तीन दिवस सुट्टीचे राहणार आहेत. सदरचे सन २०२२ …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा अनेकदा दिल्ली दौरा पण राज्यासाठी… शिवसेनेने विरोधी पक्षनेता निवडण्यापूर्वी आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करायला पाहिजे होती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्ली वाऱ्या केल्या. मात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची काहीच मागणी केली नाही. जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त होते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. विधान भवनातील विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

मंत्री संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा, तर मी कायदेशीर मार्ग अवलंबणार चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर राठोड यांचा इशारा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळातून नारळ देण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सहकार्याने सरकार स्थापन केले. मात्र या सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांचा समावेश करताच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, भाजपाच्या ‘हर घर तिरंगा’ इव्हेंटसाठी चीनमधून तिरंगा नाना पटोले यांची बुलढाणा जिल्ह्यात तर बाळासाहेब थोरात यांची धुळ्यात आझादी गौरव पदयात्रा

अत्याचारी ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी मोठा व प्रदिर्घ लढा द्यावा लागला. काँग्रेसच्या झेंड्याखाली देश एकवटला आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या काँग्रेस विचाराने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे काहीही योगदान नाही ते लोक आज ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या नावाखाली इव्हेंटबाजी करत आहेत. या इव्हेंटबाजीसाठी चीनमधून तिरंगा झेंड्यांची …

Read More »

अजित पवार म्हणाले, …दुप्पट मदतीचा निर्णय फसवा, धुळफेक करणारा एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्याने दुप्पट मदतीने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळणार नाही

विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीने झालेले पिकांचे, घराचे, शेतजमीनींचे नुकसान प्रचंड आहे. एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्याने सरकारने दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना जराही दिलासा मिळणार नाही. कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार व बागायतीसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आम्ही केली होती. ती मान्य न करुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्तांच्या तोंडाला …

Read More »

उध्दव ठाकरेंचे नाव न घेता फडणवीस म्हणाले, त्या स्थगितीमुळे १० हजार कोटी वाढले मुंबई मेट्रो मार्गिका-३ च्या सुधारित प्रस्तावास मान्यता

बहुचर्चित कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्गासाठी आरे येथे कारशेड उभे करण्याच्या कामास तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्थगिती दिली. मात्र सत्तांतरानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचा तो निर्णय रद्दबातल करत आरे येथेच कारशेड करण्याचे आदेश जारी केले. यासंदर्भात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत …

Read More »