Breaking News

राजकारण

शरद पवार म्हणाले, .. त्यामुळेच मोदी सरकारला कायदे मागे घ्यावे लागले रविवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन

देशात सर्वाधिक शेतकरी आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन बसतात, १ वर्षे आंदोलन करतात, ही दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्याची ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्यांनीच याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चाही केली नाही. भारत सरकारने देशाच्या संसदेत तीन कायदे मंजूर केले, हे कायदे शेतकऱ्यांविषयी होते, शेतीविषयी होते. …

Read More »

अरविंद सावंत यांचा सवाल, आता यांना पान्हा फुटला, मृतदेह देताना कुठे गेला होता? देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला निशाणा

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीला सुशोभित केल्याचं समोर आलं होते. त्यावरून भाजपाचे नेते सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. त्याला आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना याकूबची शवयात्रा काढून का दिली, असा सवाल …

Read More »

नितीन गडकरी म्हणाले, सरकार-बिरकारवर जास्त विश्वास ठेवू नका… नागपूरात शेतकऱ्यांना दिला सल्ला

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. अनेक सभा आणि कार्यक्रमांमधून नितीन गडकरींनी स्टेजवर केलेल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली आहे. अनेकदा तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचे कान देखील टोचले आहेत. सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना गडकरी मागेपुढे पाहात नाहीत, असा त्यांचा इतिहास आहे. या पार्श्वभूमवीर नितीन …

Read More »

राज्यपाल कोश्यारी आणि शिंदे सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल शिंदे सरकारच्या निर्णयाची तपासणी करा आणि राज्यपालांच्या कारभाराविषयी नियमावली करण्याची मागणी

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला उलथवून टाकत शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार भाजपाच्या पाठिंब्यावर स्थानापन्न झाले. मात्र या सरकारला कायदेशीर मान्यता आणि एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित असल्याने या सरकारच्या निर्णयाची तपासणी करण्यासाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन करावी तसेच राज्यपालांच्या निर्णय क्षमतेसंदर्भात कालावधी निश्चित …

Read More »

नाना पटोले म्हणाले, …ही तर भाजपाची बौद्धिक दिवाळखोरीच काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'ला मिळणाऱ्या प्रतिसादाने भाजपाला भरली धडकी

देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली असून या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष बिथरला आहे. राहुलजींच्या टीशर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे भाजपाला काढावे लागत असून यातूनच …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी विद्यार्थ्यासाठीचा ‘तो’ रद्द केलेला निर्णय पुन्हा लागू करा शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा फी योजना पूर्ववत सुरू करा

महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या विजाभज,विमाप्र व  इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा फी ही योजना बंद करण्यात येऊ नये अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली. छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, …

Read More »

भाजपाच्या ‘त्या’ व्हिडिओला शिवसेनेकडून फडणवीस, राज्यपालांच्या फोटोने प्रत्युत्तर किशोरी पेडणेकरांनी दाखविले फोटो

मागील काही दिवसांपासून याकूब मेनन यांच्या कबरीवरून भाजपा-शिवसेनेत सामना रंगला असतानाच याकूब मेनन याचा नातेवाईक रौफ मेमन याच्यासोबत मुंबई महापालिकेच्या तत्कालीन महापौर तथा शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर या मिटींग करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओवरून भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी भाजपाच्या या हल्ल्याला …

Read More »

भाजपाने राहुल गांधीच्या टी-शर्ट वरून साधला निशाणा: काँग्रेसचा सवाल, घाबरलात की काय? भाजपा आणि काँग्रेसमध्ये रंगले ट्विट वॉर

केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने सुरु केलेल्या भारत जोडो पदयात्रेचा आज तिसरा दिवस या पदयात्रेची सुरुवात कन्याकुमारी येथून बुधवारी ७ सप्टेंबर २०२२ रोजी झाली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या वेळी राहुल गांधी यांच्या हाती तिरंगा ध्वज सोपावला. यात्रेच्या माध्यमातून …

Read More »

लव्ह जिहादच्या मुद्यावरून काँग्रेसने विचारले उपमुख्यमंत्री फडणवीसांना ‘हे’ दोन प्रश्न फोन रेकॉर्डींग आणि लव जिहाद असल्याचा रंग देण्याचा प्रयत्न करण्यावरून साधला निशाणा

अमरावती येथील धारणीतील रुक्मिणी नगर परिसरातून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीला एका मुस्लिम तरूणाने पळवून नेऊन तिच्या मनाविरोधात लग्न केल्याचा आरोप करत हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा कांगावा भाजपा समर्थक खासदार नवनीत राणा आणि भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केला. मात्र मुलीचा शोध लागल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. …

Read More »

जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला, …आता राज्य करायला उसंत मिळेल भेट देण्याच्या उपक्रमावरून लगावला टोला

सर्व गणपतींना भेट देण्याचा उपक्रम आता बाप्पाच्या जाण्यानंतर महाराष्ट्रात पूर्ण होणार असून आता राज्य करायला थोडी उसंत मिळेल असा टोला लगावतानाच राज्यात संकटात असलेल्या बळीराजाला मदत करायला हात सरसावतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त केली. जयंत पाटील यांच्या घरगुती गणेशाचे आज विसर्जन …

Read More »