Breaking News

राजकारण

पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्का

पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये आणि पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, सर्वाधिक चर्चा काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? याची कारण…

देशाला अनेकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले. त्यातून प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा, बोलण्याचा अधिकार मिळाला आहे. मात्र या अधिकारावर गदा आणण्याचे काम सध्या सुरु असून विरोधात बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. अमृतवाहिनी शेती …

Read More »

न्यायालयाच्या निकालानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, उत्साहात या, शिस्तीने या पण गालबोट… सर्वोच्च न्यायालयाचा निकालही लोकशाहीला दिशा देणार असेल

शिवसेनेतील बंडानंतर परंपरागत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावर आणि पक्षावर शिंदे गटाकडून दावा करण्यात आला. यापैकी शिवसेनेवरील दाव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर याचिका प्रलंबित आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नसला तरी शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा घेण्याबाबत मुंबई महापालिकेकडून नकारघंटा कळविल्यानंतरही मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाला धक्का देत उध्दव ठाकरे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न आज प्रत्यक्षात नवीन आष्टी - अहमदनगर रेल्वे मार्ग दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

नवीन आष्टी – अहमदनगर हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सर्वच प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधण्यावर शासन भर देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. अहमदनगर – बीड – परळी …

Read More »

आयडॉलच्या एमएमएस व एमसीए प्रवेश परीक्षांचे अर्ज आजपासून ऑनलाईन सुरु ७२० आणि २ हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला एआयसीटीई व यूजीसीने एमएमएस व एमसीए हे दोन अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु करण्यास परवानगी दिली असून या अभ्यासक्रमाचे प्रवेश परीक्षांचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून आजपासून ( दिनांक २४ सप्टेंबर २०२२ ) सुरु होत असून शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२२ आहे. तर एमएमएस व …

Read More »

नाना पटोले म्हणाले, ‘भारत जोडो यात्रे’ मुळेच रा.स्व. संघाला मुस्लीम समाज आठवला

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो पदयात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून जाती-धर्मात तेढ निर्माण करुन व्देषाचे राजकारण करणाऱ्या पक्ष, संघटनांचे धाबे दणालेले आहेत. हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून आपले इस्पित साधणाऱ्या भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पायाखालची वाळू या पदयात्रेमुळे सरकली आहे म्हणूनच आरएसएसला मुस्लीम समाजाची आठवण झाली असून सरसंघचालक …

Read More »

आदित्य ठाकरेंना भाजपाने पाच प्रश्न विचारत दिले आव्हान, आधी प्रकल्पाची जागा दाखवा

घराण्याच्या वारशातून शिवसेनेचे नेतेपदाची माळ गळ्यात पडलेले आदित्य ठाकरे यांच्या वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयीच्या आक्रोशाचे पितळ येत्या शनिवारी ते स्वतःच उघडे करणार आहेत. या प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारने अडीच वर्षात काहीही प्रयत्न केले नसल्याचा पुरावा आदित्य ठाकरे स्वतःच येत्या शनिवारी तळेगावजवळ आयोजित केलेल्या आंदोलनातून देणार असल्याने त्यांच्या आंदोलनाची महाराष्ट्र वाटच पाहात आहे, अशी …

Read More »

भाजपाचा इशारा, उद्धव ठाकरे… नाही तर आहे ते आमदारही गमवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला इशारा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतका धसका का घेतला आहे, समजत नाही. त्यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी विचार करून बोलावे नाही तर उरलेल्या आमदारांपैकी बहुतेकजण सोडून जातील आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणत केवळ चारच उरतील, अशी खोचक इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिला. छत्रपती संभाजीनगर येथे …

Read More »

निर्मला सीतारामन यांनी पुणे दौऱ्यात वेदांता फॉक्सकॉनच्या प्रश्नाला दिली बगल ज्या प्रकल्पांना विरोध केला त्याचा गुजरातला कोणता फायदा होणार होता

राज्यात तीन ते चार महिन्यापूर्वी सत्तेत होते ते वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत टीका करत आहेत. बुलेट ट्रेन, रिफायनरी, नाणार प्रकल्प थांबविणारे लोक आता बोलत आहेत. हे सगळे हजारो कोटींचे प्रकल्प राज्याच्या हिताचेच होते. मुंबईमधील आर कारशेडला विरोध करणारे कोण आहेत ? या शब्दात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेदांत फॅाक्सकॅान प्रकल्पाच्या …

Read More »

नारायण राणे यांना किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर, एवढी मिरची लागण्याची काय गरज? एखाद्या गुंडासारखी भाषणा केंद्रीय मंत्री बोलतायत

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी २१ सप्टेंबर रोजी गटनेत्यांच्या मेळाव्यात भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  तसेच बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली. या टीकेनंतर शिंदे गट तसेच भाजपाचे नेतेही आक्रमक झाले असून त्यांनी उद्धव ठाकरेंना जशास तसे प्रत्युत्तर दिले. केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नारायण राणे यांनी आज गुरुवारी थेट पत्रकार …

Read More »