Breaking News

राजकारण

काँग्रेसचा आरोप, ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून शाळकरी मुलांमध्ये भाजपाचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘परिक्षा पे चर्चा’साठी शाळा व विद्यार्थी वेठीस

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशातील शाळकरी मुलांसाठी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम सरकारी असताना राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या आडून भारतीय जनता पक्ष शाळकरी मुलांमध्ये पक्षाचा प्रचार करत असून हे अत्यंत गंभीर असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे …

Read More »

रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका, सरकार ४० नव्हे तर १३ कोटींसाठी चालवायचे असते… लोकच भूंकप घडवून आणतील

राज्यातील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीत विजय मिळविल्यानतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नायगांव येथे क्रांतीज्योतील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास भेट दिली. त्यानंतर सातारा क्लब येथे प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. यावेळी रोहित पवार बोलताना म्हणाले, सरकार …

Read More »

उध्दव ठाकरेंनी ठाण्यात साधला मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा, मात्र आनंद आश्रमात जाणे टाळले ठाण्यातील आरोग्यासाठी लवकरच परत येणार असल्याचा शिंदे गटाला दिला इशारा

राज्यात शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर या फुटीचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आज पहिल्यांदाच आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आले. यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधताना म्हणाले, निष्ठेच्या पाघंरूणाखाली काही मिंधे लपले होते. अस्सल कडवट शिवसैनिक असा विकला जाऊ शकत नाही अशी खोचक टीका एकनाथ शिंदे …

Read More »

पहाटेच्या शपथविधीवरून जयंत पाटलांकडून थेट “शरद पवारां”कडे बोट नंतर “कयास”चे स्पष्टीकरण अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा बोलण्यास नकार

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात औट घटकेचे सरकार स्थापन झाले. त्यासाठी भल्या पहाटेच फडणवीस-पवार यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. या शपथविधीवरून आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य करत त्या पहाटेच्या शपथविधी मागे आमचे प्रमुख नेते शरद पवार यांची …

Read More »

तिरुपतीतील अपघातात मृत पावलेल्या सोलापूरच्या युवकांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर येथील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला. त्यात सोलापूर येथील पाच तरुणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त करतानाच मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देण्याची घोषणा …

Read More »

तांबेना पाठिंबा दिल्यानंतर नाना पटोलेंनी केली मोठी कारवाईः कमिटीच बरखास्त पक्षविरोधी कारवाया केल्याने नगरचे जिल्हाध्यक्ष सुरेश साळुंखे निलंबित

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराला (सत्यजीत तांबे) पाठिंबा दिल्याने अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश साळुंखे यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यंनी दिली. …

Read More »

राज्यपाल कोश्यारी राज्याला उद्देशून बोलताना म्हणाले, बलशाली महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी याप्रसंगी राज्याला …

Read More »

नाना पटोले म्हणाले, ७५ तही महागाई, बेरोजगारी सारख्या मुलभूत गरजांसाठी झ़ग़डावे लावतेय लोकशाही व संविधान वाचवण्याचा राहुल गांधींचा लढा पुढे नेऊया

देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना महागाई, बेरोजगारी सारख्या मुलभूत गरजांसाठी जनतेला झ़ग़डावे लागत आहे. मोठ्या संघर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ व महान ग्रंथ ‘संविधान’ या देशाला दिले, पण मागील ८ वर्षात लोकशाही व संविधान धोक्यात आले असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी …

Read More »

महाराष्ट्राला तीन ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पदक विजेत्यांची घोषणा

दैनंदिन जीवनात जनतेच्या संरक्षणासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या देशातील एकूण ४३ मान्यवरांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार आज जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती यांच्या मंजूरीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2022’ जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील रविराज अनिल फडणीस यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’, तर महेश शंकर …

Read More »

जमिनीच्या तक्रारी सोडविण्यासाठी महसूल विभागाकडून खास अभियान राज्यात उद्यापासून ‘महाराजस्व’ अभियान

सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांचा महसूल विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी महाराजस्व अभियान २६ जानेवारी ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार असून महसूल व वन विभागाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे. एक …

Read More »