Breaking News

राजकारण

आदित्य ठाकरेंचा सवाल, ते ४० गद्दार सांगू शकतात का? राज्यातील जनतेला बंडखोरी आवडलेली नाही

शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर असून बंडखोर शिंदे गटावर टीका केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात वातावरण इतकं पेटलं आहे जर आजच निवडणूक झाली तर निकालानंतर एकच रंग दिसेल तो म्हणजे भगवा भगवा आणि भगवा. आता काही लोक विचारतील की भगवा रंग कुणाचा? कुठल्या गटाचा? तर …

Read More »

नाना पटोलेंची टीका, भाजपा टिळक कुटुंबाला विसरली कसबा व चिंचवडमधून महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील

पुण्यातील कसबा व चिंचवड मतदारसंघातील विधानसभेची पोटनिवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्रितपणे लढवत आहे. या दोन्ही जागांवरही महाविकास आघाडीचेच उमेदवार मोठ्या बहुमताने निवडून येतील, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन कसबा विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांची …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी एमसीएचआय - क्रेडाई, ठाणे, ठाणे इस्टेट एजंट असोसिएशन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचे घर हवे असते. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येत्या दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार आहोत. त्याचप्रमाणे ठाण्यातील रस्तेही खड्डेमुक्त करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. एमसीएचआय – क्रेडाई, ठाणे, ठाणे इस्टेट एजंट असोसिएशन …

Read More »

सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित परदेशी शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी केली ही मागणी एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना ६ महिन्यांचा शैक्षणिक भत्त्यासहित निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत

‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ही योजनेतील ‘एटीकेटी’धारक विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करून या योजनेतील त्रुटी दुर कराव्यात तसेच त्या विद्यार्थ्यांना ६ महिन्यांचा शैक्षणिक भत्त्यासहित निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. सुप्रिया …

Read More »

नाना पटोलेंचा सवाल, मोदी सरकार अदानी समुहातील गैरकारभाराच्या चौकशीला का घाबरते ? जनतेच्या एका-एका पैशाचा हिशोब घेतल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे ‘हम दो, हमारे दो’ चे सरकार आहे असे काँग्रेस पक्ष सातत्याने सांगत होता ते खरे ठरले आहे. खा. राहुल गांधी हे नेहमी अदानी व मोदी यांच्या घनिष्ठ संबंधावर बोलत होते. अदानीचा फुगा फुटेल असेही राहुल यांनी सांगितले होते. उद्योगपती मित्रांसाठी काम करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी करोडो …

Read More »

सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर पहिल्यांदाच बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, हे पक्षिय राजकारण सत्यजीत तांबे चांगल्या मतांनी निवडूण आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक झाली. मात्र या निवडणूकीतील इतर उमेदवारांच्या चर्चेपेक्षा सर्वाधिक चर्चा नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांची झाली. तांबे यांच्या बंडखोरीबाबत अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव घेत केलेले वक्तव्य, त्यानंतर नाना पटोले यांचे वक्तव्यांच्या …

Read More »

सामान्य जनतेची गुंतवणूक अदानीच्या खिशात घालणाऱ्या मोदी सरकारविरोधात एल्गार प्रदेश काँग्रेसचे उद्या ६ तारखेला राज्यातील एसबीआय, एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. हा पैसा सुसक्षित रहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी प्रदेश काँग्रेस …

Read More »

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एन्ट्री पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समितीवरून भारत राष्ट्र समिती नव्या पक्षाचे नाव

देशात वाढत्या भाजपाच्या हिंदूत्ववादी राजकारणाला रोखण्यासाठी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात येत तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेत भाजपेतर पक्षाची मोट बांधण्यासाठी आपण तयार असल्याचे जाहिर केले. तसेच महाराष्ट्राने नेहमीच दिल्लीच्या तख्ताला टक्कर दिल्याने या गोष्टीची सुरुवात महाराष्ट्रातून करणार असल्याचे जाहिर केले. त्यानुसार नव्या राष्ट्रीय पक्षाची …

Read More »

अजित पवार म्हणाले, काहीही जण सकाळी सकाळी टाकतात तर मी कामाला सुरुवात करतो पवारांचा रोख मनसे प्रमुख राज ठाकरेंकडे तर नाही ना चर्चेला सुरुवात

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नेवासा येथील सभेत बोलताना राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. अजित पवार यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, राज्यात न आलेले प्रकल्प आणि सुरू असलेल्या प्रकल्पांवरील स्थगितीवरून राज्य सरकारचा समाचार घेतला. राज्यात नवं सरकार स्थापन होऊन ६ महिने झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार …

Read More »

राज ठाकरेंचे पत्राद्वारे आवाहन, जो उमदेपणा भाजपाने दाखविला तोच महाविकास आघाडीने दाखवावा बिनविरोध पोटनिवडणूकीसाठी राज ठाकरेंचे विरोधकांना आवाहन, पण..

पिंपरी चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (५ फेब्रुवारी) सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहून आवाहन केलं आहे. मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असं आवाहन राज ठाकरेंनी पत्राद्वारे केले. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेच्या …

Read More »