Breaking News

राज्यात ५० आमदारांचे बंड आणि गॅस मागे ५० रूपयांची दरवाढ काय निष्कर्ष काढायचा? प्रवक्ते महेश तपासे यांचा सवाल

राज्यात एकाबाजूला शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून काही तासांचा अवधी होत नाही तोच आजपासून केंद्र सरकारने गॅसच्या दरात ५० रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने या दरवाढीवरून खोचक सवाल करत निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या सत्ता संघर्षात शिवसेनेतील ४० आमदारांनी तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या १० असे मिळून ५० आमदारांनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपास यांनी या तात्काळ दरवाढीवरून काय निष्कर्ष काढायचा असा सवाल उपस्थित केला.

एकीकडे महाविकास आघाडीतील ५० आमदार फोडले आणि दुसरीकडे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताच भाजपासरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये ५० रुपयांची दरवाढ केली आहे यावरुन जनतेने काय तो निष्कर्ष काढावा? असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपा सरकारला केला.

महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या ५० आमदारांचे बंड आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर लगेचच केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये ५० रुपयांची दरवाढ केली आहे. दोन्हीकडे ५० बंडखोर आमदार आणि ५० रुपयांची गॅस सिलेंडर दरवाढ हे आकडे काहीतरी संकेत देत आहेत असा खोचक टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी एक मोठ्या अदृश्य शक्तीने बंडखोर आमदारांवर जो काही खर्च केला असेल तो खर्च गॅस दरवाढीतून वसूल केला जात आहे का? अशी शंका आता जनतेतून व्यक्त व्हायला लागली आहे असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचं सरकार आलंय आम्ही पेट्रोल – डिझेलवरील कर कमी करु असा दिलासा देण्याचे वक्तव्य केलेले असतानाच दुसरीकडे भाजपने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ केल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *