मुंबईः प्रतिनिधी
दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनता भाजपा हीच देशद्रोही आहे हे मतदान करुन सिद्ध करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदींनी जनतेला देशद्रोहींच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
मोदींच्या या आवाहनावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदींवर निशाणा साधला. जनता ही दिल्लीची मालक आहे त्यामुळे ही जनताच आता भाजपाला दणका देईल असेही नवाब मलिक म्हणाले.