Breaking News

राष्ट्रपती, राज्यपालांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला,”विरोधी पक्षात असताना…” राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची टोलेबाजी

मराठी ई-बातम्या टीम

दरबार हॉल ,राजभवन, आमच्यासाठी नवं नाही. विरोधी पक्षात होतो तेंव्हा ही वर्षभरातून एखाद दुसऱ्यावेळी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. आमच्या व्यथा मांडत होतो अशी आठवण सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपाचे नेते सातत्याने राजभवनावर येवून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रारी करत असल्याच्या कृत्यावरून त्यांनी टोला लगावला. परंतु मागील काही महिन्यांपासून राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यात संघर्ष सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की आजही आमचा संवाद सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजभवनातील नव्या दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर, वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

मला आज या नुतनीकरण केलेल्या, ऐतिहासिक- वैभवशाली परंपरा लाभलेल्या दरबार हॉलच्या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहाता आले याचा आनंद. मुख्यमंत्री म्हणून व्यक्तीश: आनंद असल्याचे सांगत या वास्तुने १०० वर्षाहून अधिक काळात घडलेल्या घटना घडामोडी पाहिल्या. ३० एप्रिल १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी याच वास्तूत केले त्याचा विशेष आनंद आहे. ही नवीन रुप धारण केलेली वास्तु आहे. यात ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचे मनापासून आभार मानत दरबार हॉलचे अप्रतिम असं सौंदर्य नव्या दमाने लोकांसमोर ठेवले. मुंबई तील राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन असल्याचे त्यांनी सांगितले.

एका बाजूला अथांग समुद्र दुसऱ्या बाजूला सुंदर झाडं, ज्याला शहरातील जंगल असं देखील म्हणता येईल. याने हे राजभवन अधिकच सुंदर झाले आहे. इथली हवा थंड आहे, राजकीय हवा कशीही असू द्या, इथली हवा थंड आहे असल्याचे प्रतिपादन केले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षरित्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आपणही थंड जागेचा अनुभव घेत थंडपणा घ्या असे तर सूचवायचे नाही ना अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली.

पावसाळ्यात थुई थुई नाचणारे मोर आहेत. इथून सर्पमित्राकडून विषारी सर्प पकडल्याचे फोटो आपण पाहतो. राजभवनसारखी अशी वास्तू शोधून सापडणार नाही. ब्रिटीश गव्हर्नरचे हे चौथे निवास स्थान होते. राष्ट्रपती पदी असताना स्व. ग्यानी झैलसिंग यांनी शिवसेनाप्रमुखांना बोलावलं होते, प्रणवदा होते त्यांनी मला भेटायला बोलावले होते. अशा अनेक आठवणींना मुख्यमंत्र्यांनी उजाळा देत या संपूर्ण वास्तूचे जुनी वैशिष्ट्ये जपत आपण नवीन वास्तू उभारली आहे. जुना वारसा जपून आपण आधुनिकीकरणाकडे चाललो आहोत हे या वास्तूचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.

ऊन वारा पाऊस झेलतांना इमारतीवरही परिणाम होतो. वैशिट्ये कायम ठेऊन नुतनीकरण करण्याचे आवाहन पेलले. आधुनिकता अंगी बाळगतांना संस्कृती जपणे, जुन्या नव्याचा समतोल साधणे गरजेचे. पारतंत्र्यांच्या घटनांची आठवण जपणारी वास्तू सशक्त लोकशाहीचा वारसा पाहण्यासही सज्ज झाली आहे. या वास्तूत आनंददायी घटना घडत राहतील अशी अपेक्षा करतो असे सांगत राज्यपाल कोश्यारी यांना त्यांनी शेवटी टोला लगावला.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *