Breaking News

Editor

मुख्यमंत्री ठाकरेंच्या मागणीला अखेर यश: १८ वर्षावरील सर्वांना लस पंतप्रधान मोदींचे मानले आभार, १ मे पासून लस मिळणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी कोरोनाची लस १८ वर्षावरील सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सर्वप्रथम मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत आणि पत्राद्वारे केली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. अखेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यासंदर्भात पंतप्रधान …

Read More »

चंद्रकांत पाटील यांचा खा. राऊतांना सल्ला तर मलिक यांची राज्यपालांकडे तक्रार रेमडेसिवीरवरून राजकारण थांबविण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. केंद्र सरकारने महाराष्ट्राला होणारा …

Read More »

अजित पवारांचे आदेश, आर्थिक पॅकेजमधील लाभार्थ्यांना मदत निधी वाटप करा निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची युद्धपातळीवर कार्यवाही

मुंबई: प्रतिनिधी ‘कोरोना’संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ५ हजार ४७६ कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिले. सात कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य, सामाजिक न्याय विभागाच्या ३५ लाख, आदिवासी विभागाच्या १२ …

Read More »

राज्यातील किराणा दुकाने आता सकाळी ७ ते ११ पर्यंतच खुली राहणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ऑक्सिजन, रेमडीसीवीर उपलब्धतेबाबत महत्वाची बैठक

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कडक निर्बंध लागू करूनही जनता किराणा दुकानाच्या नावाखाली रस्त्यावर बाहेर फिरत आहे. तसेच गर्दीही करत आहे. त्यामुळे आता किराणा दुकाने उघडी ठेवण्यावर निर्बंध आणण्यात आले असून राज्यातील सर्व किराणा दुकाने आता सकाळी ७ ते  सकाळी ११ वाजण्याच्या कालावधीत सुरू ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या …

Read More »

रेल्वेने प्रवासानंतर १५ दिवस होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक लांब पल्ल्याच्या गाड्यानी राज्यांतर्गत आणि जिल्ह्यातंर्गत जाण्यासाठी नियम

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहिर केली असून लांब पल्याच्या रेल्वे गाड्यांनी करणाऱ्यांसाठी आणि महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असेल तरी ४८ तास आधी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबरोबर आपल्या इच्छितस्थळी पोहोचल्यानंतर १५ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्याचे आदेश राज्य …

Read More »

आता घरीच जाणून घ्या आपल्या फुफ्फुसाचे आरोग्य फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का ? याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या …

Read More »

कोरोना : बाधितांबरोबरच आता मृतकांची नोंदही सर्वाधिक ६८ हजार ६३१ नवे बाधित, ४५ हजार ६५४ बरे झाले तर ५०३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत असून प्रादुर्भाव पसरण्याचे प्रमाणही जास्त आहे. काल ६७ हजार बाधित आढळून आल्यानंतर आज राज्यात पुन्हा ६८ हजार ६३१ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यतची ही सर्वाधिक संख्या आहे. तर राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ६ लाख ७० हजार …

Read More »

राज्याच्या गृहमंत्र्यांचा फडणवीस आणि भाजपाला इशारा पोलिसांवरील दबाव सहन करणार नाही- मंत्री वळसे-पाटील

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सध्या रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा असताना या औषधांचा मोठा साठा मुंबईत येणार असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत काल रात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब देखील …

Read More »

केंद्राने साठेबाजी, काळाबाजार करण्याची फडणवीस व भाजपाला परवानगी दिलीय का? पोलीस कारवाईत अडथळा आणणाऱ्या फडणवीस, दरेकर व प्रसाद लाडविरोधात कारवाई करा- नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकाला व मालकाला ताब्यात घेतले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकून त्याला सोडवले आणि तो साठा भाजपाने केंद्रीय मंत्र्यांच्या परवानगीने मिळवल्याचा दावा केला. वास्तविक रेमडेसिवीरचा साठा खाजगी व्यक्तीला करता येत नाही तर …

Read More »

कोंकणातील शिवाजी महाराजांचे किल्ले आणि कातळ शिल्पे होणार जागतिक वारसा ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोकडून तत्वत:स्वीकार

मुंबई : प्रतिनिधी युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दर वर्षी १८ एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी ‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य’ ही संकल्पना पुढे ठेऊन हा दिवस साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यामार्फत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत सादर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोने तत्वत: स्वीकार …

Read More »