Breaking News

सीएए आमच्या अखत्यारीत नसताना आम्ही का राबवावा ? राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी

सीएए अंमलबजावणी राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही. सर्व अधिकार केंद्राकडे आहे. आमच्या अखत्यारित नसताना का राबवावा असा सवाल करतानाच एनआरसी लागू होवू देणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केले.

एनआरसी आणणार नाही असे सांगून आपली भूमिका भाजपने बदलली. मात्र याबाबत सरकारने व आमच्या पक्षाने भूमिका स्पष्ट केली आहे.

एनपीआरसाठी सेन्सेस २०१० मध्ये झाला, त्यावेळी प्रश्नावली तयार झाली होती. मात्र जे प्रश्न तयार झाले ते आम्हाला मान्य नाहीत. त्यामुळे तिन्ही पक्षाचे लोक याबाबत एकत्र बसतील. अमित शहांना अपेक्षित आहे ते आम्ही लागू करु देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *