महाविकास आघाडी अडचणीत वगैरे काही नाही. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यामुळे आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. आज शरद पवार यांच्याशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. अपक्षांशी विविधस्तरावर चर्चा …
Read More »जयंत पाटील म्हणाले, भाजपाला जशी मते कमी पडतात तशी आम्हालाही… राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिली माहिती
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी जाहिर करण्यात आल्यानंतर भाजपाकडून माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अपक्षांची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो. …
Read More »राणे, पाटील हे सातत्याने तारखा देत असतात ऐकत असतो, आनंदही घेत असतो राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा टोला
काही दिवसांपूर्वी भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार ६ जूनला कोसळणार असल्याचा अल्टीमेटम दिला. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेत, मंत्री नारायण राणे, चंद्रकांत पाटील हे सातत्याने तारखा देत असतात, आम्ही ऐकत असतो, वाचत असतो, आनंदही घेत असतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसला राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिल्याने राजकिय आरोपांना सुरुवात
नुकत्याच झालेल्या भंडारा आणि गोंदियाच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत आघाडीच्या धर्माला तिलांजली देत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिल्याने सर्वाधिक संख्याबळ असूनही काँग्रेसला विरोधात बसावे लागले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठित सुरा खुपसल्याचा आरोप ट्विट करत केला. विशेष म्हणजे …
Read More »हे करणार ते करणार… हनुमानाच्या नावाने करणार…मग भुकेचा प्रश्न सुटणार का? शाहू - फुले - आंबेडकरांचा विचार हाच ख-या अर्थाने आपल्याला दृष्टी आणि शक्ती देणारा आहे - शरद पवार
हे करणार ते करणार… हनुमानाच्या नावाने करणार… आणखी कुणाच्या नावाने करणार…या सगळ्या चर्चा… मागण्या याने बेकारीचा प्रश्न… भुकेचा प्रश्न सुटणार आहे का?…आज काही दिवस आपण बघतोय जात – धर्म यांच्या नावाने पुन्हा एकदा देशाला मागे नेण्याचा प्रयत्न सुरू केला जातोय अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता राष्ट्रवादी …
Read More »जयंत पाटील म्हणाले, त्यांचे बंधु मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते… गुजरातचे कौतुक केले आता उत्तर प्रदेशचे करतायत
जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करायचं नाही असं ठरवलं असेल तर मग दुसर्या राज्याचे कौतुक ते करणारच असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. राज ठाकरे यांनी युपीचे कौतुक केले आहे असा प्रश्न …
Read More »सर्वांचा डिएनए एक आहे तर मागे राहिलेल्या लोकांच्या आरक्षणाला का विरोध कागलमध्ये पुन्हा एकदा मोठी सभा झालीय त्यामुळे राष्ट्रवादी मोठा पक्ष होईल याबद्दल शंका नाही - जयंत पाटील
पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहे. जनतेचे प्रश्न आहेतच. परंतु पवारसाहेबांच्या कृतीशील विचारांवर काम करतोय त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तीन लाखापेक्षा जास्त कार्यकर्त्यांशी भेटण्याचा प्रयत्न केला. सर्व कार्यकर्त्यांना जोडणारा एकच धागा आहे तो म्हणजे पवारसाहेब आहेत. आज परिवार संवाद यात्रा संपली. कागलमध्ये सभा झालीय त्या त्यावेळी पक्षाचा मोठा …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंतराव थापा मारून दिवस ढकलणे बंद करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पक्षाच्या संवाद यात्रेत सरकारच्या चांगल्या कामांबद्दल किंवा पक्षाच्या विचारसरणीबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून थापा मारून आणि टिंगल टवाळी करून दिवस ढकलणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंद करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेत …
Read More »मिटकरींच्या “त्या” वक्तव्यावरील गोंधळावर अखेर जयंत पाटलांनी टाकला पडदा विषयावर पडदा टाकण्यासाठी व्यक्त केली दिलगिरी
इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार यात्रेच्या सभेत पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या त्या वक्तव्यावरून सध्या बराच वाद सुरू झाला. मिटकरींच्या त्या वक्तव्याच्या निषेधार्ह ब्राह्मण महासंघानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील कार्यालयासमोर आंदोलन करत तीव्र आक्षेप घेतला. तसेच त्यांच्या माफीची मागणी केली. भाजपाने देखील यासंदर्भात टीकेचा सूर लावला असताना अमोल मिटकरी …
Read More »राजू शेट्टी बाहेर पडल्यानंतर जयंत पाटील पहिल्यांदाच म्हणाले, कारणच नव्हतं महाविकास आघाडी सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य
राज्यातील महाविकास आघाडीमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे बाहेर पडल्यानंतर त्यांच्या बाहेर पडण्याबाबत महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्यांनी याबाबत ब्र शब्दही काढला नाही. मात्र आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, एखादी गोष्टी मला किंवा कोणत्याही मंत्र्यांना सागितली व त्यांच्या कामांना नकार दिला असे …
Read More »