Breaking News

Tag Archives: devendra fadnavis

नाना पटोले यांचा सवाल, आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी भाजपा सरकारला १० वर्ष का लागावी ? आरक्षणप्रश्नी सरकारने भूमिका स्पष्ट करुन मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवावी

राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ट्रिपल इंजिन सरकारची आरक्षणप्रश्नी स्पष्ट भूमिका नसल्याने हा गुंता वाढत चालला आहे. समाजा-समाजात संशय वाढत चालला आहे. राज्य सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही. सरकारमधील मंत्री बोलतात एक तर दुसरीकडे जाहिरात देऊन वेगळाच संदेश देत आहेत, ही गोंधळाची परिस्थिती …

Read More »

ट्विट करत रोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला, राजकारणापायी…. निधी वाटपावरून साधला निशाणा

राज्यात शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवार गटानेही भाजपाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अजित पवार हे सत्तेत सहभागीही झाले. मात्र अजित पवार हे जरी राज्याचे गृहमंत्री असले तरी त्यांना पूर्ण अधिकार अद्यापही दिले नसल्याचे आता स्पष्ट होत आहे. याच मुद्यावरून शरद पवार समर्थक रोहित पाटील यांनी …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या मंत्र्यांनी निर्णय घेतला त्यांच्याच बरोबर सत्ता उपभोगायची… राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर झेपत नसेल तर त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना सांगावं

भारतीय जनता पक्षाबद्दल हसावं आणि त्यांच्या या केविलवाण्या प्रयत्न बद्दल काय बोलावं हा प्रश्न मला पडला आहे. माझी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनम्र विनंती आहे की, आपण सगळ्या वृत्तवाहिन्यांवर पाहतच असाल. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाचा परिणाम तेथील सामान्य नागरिकांवर होत आहे. अनेक ठिकाणी …

Read More »

नाना पटोले यांचा टोला,…एकनाथ शिंदे, अजित पवारांना माफी मागायला सांगा शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योग राज्याबाहेर घालवण्याचे पाप भाजपाचेच

देवेंद्र फडणवीस व भाजपा यांनीच राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले आहे. राज्यात येणारे प्रकल्प गुजरातला पळवले आणि सरकारी नोकर भरतीचा खेळखंडोबा करुन तरुणांचे आयुष्य बरबाद केले आहे. त्यामुळे ही आंदोलनाची नौटंकी बंद करून भाजपा व देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, तसेच या पापातील त्यांचे भागीदार मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

विजय वडेट्टीवार यांनी केला सरकारच्या या वृत्तीचा निषेध मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाबाबत सरकारचा जाणीवपूर्वक भेदभाव

राज्यातील टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये तसेच योजनांमध्ये एकसमानता आणण्यासाठी व धोरण ठरविण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. परंतु सरकारने भेदभाव करत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला जाणीवपूर्वक यातून वंचित ठेवले आहे. सरकारच्या या वृत्तीचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला …

Read More »

अशोक चव्हाण यांचे प्रत्युत्तर, काँग्रेस आघाडीने कार्यकारी पदांची कंत्राटी भरती केली नाही देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना दिले प्रत्युत्तर

काँग्रेस आघाडी सरकारने कधीही कार्यकारी पदांची कंत्राटी भरती केली नाही, आता मात्र तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस अशा पदांवर सुद्धा कंत्राटी भरतीचा प्रयत्न झाला आहे. काँग्रेस आघाडी सरकारवर खापर फोडून राज्य सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करतेय असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. तसेच अशोक …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता उद्धव ठाकरे-शरद पवार यांनी माफी मागावी कंत्राटी नोकरीचा शासन आदेश रद्द

कंत्राटी भरतीचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चांगलाच पेटलेला असताना महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. वादग्रस्त ठरत असलेला हा कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केला. राज्यात कंत्राटी भरतीचे संपूर्ण पाप हे ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांचे म्हणजेच राष्ट्रवादीचे आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

नाना पटोले यांची टीका, ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था काँग्रेस पक्ष व तरुणांच्या रेट्यामुळेच कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याची भाजपा सरकारवर नामुष्की

सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्यावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला होता. सरकारी नोकरीची प्रतिक्षा करणाऱ्या तरुण वर्गातही याबाबत तीव्र संताप होता. काँग्रेस पक्षाने तरुण वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत भाजपा सरकारला उघडे पाडले. तरुण वर्गाची नाराजी परवडणारी नाही, निवडणुकीत दारुण पराभव होऊ शकतो हे लक्षात आल्यानेच भाजपाप्रणित सरकारवर कंत्राटी …

Read More »

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतच्या इतक्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती कार्यक्रमांत समानता आणणार

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रम व योजनांमध्ये एकसमानता आणण्यासाठी कायमस्वरुपी समिती गठीत करण्याचा तसेच एक सर्वंकष धोरण आखण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आजच्या बैठकीत अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती या योजनांकरिता लाभार्थींच्या संख्येस मान्यता देण्यात आली. राज्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले “हे” महत्वाचे निर्णय वीज प्रकल्प, सहआयुक्त पद निर्मिती, महाप्रितकडून घरे, कामगार विभागासाठी घेतले महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठीकत कोराडी औष्णिक प्रकल्पातून क्रिटीकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्प व तसेच धर्मादाय संस्था कार्यालयात सह आयुक्त पदाची निर्मिती, मागासवर्गीय समाजाला महाप्रितकडून परवडणाऱ्या दारातील घरे, अहमदनगर जिल्ह्यात नवे पशुवैद्यकीय रूग्णालय, बांधकाम कामगारांसाठीच्या नियमात सुधारणा आदी प्रश्नी निर्णय घेण्यात आला आहे. या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …

Read More »