Breaking News

Tag Archives: cm fadnavis

महालक्ष्मी मंदिर परिसराच्या ८० कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता अद्ययावत माहिती देणारे स्मार्ट वाहनतळ उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

मुंबई : प्रतिनिधी कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवस्थान मंदिर परिसराच्या सुमारे ८० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने तत्वतः मान्यता दिली. विकास आराखड्याअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या तीनही वाहनतळावर पार्किंगची अद्ययावत माहिती देणारे डिजिटल फलक उभारून स्मार्ट वाहनतळ उभारण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. मुंबईतील …

Read More »

ग्रामीण भागातील मुली-महिलांना ५ ते ३० रूपयात सॅनेटरी नॅपकिन मिळणार अस्मिता योजनेंतर्गत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या मुली आणि महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाचे असलेले सॅनिटरी नॅपकिन माफक दरात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे या नॅपकिन अस्मिता योजनेंतर्गत ५ रूपयांपासून ते ३० रूपयांपर्यत महिला व मुलींना देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अस्मिता योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाव्दारे ग्रामीण …

Read More »

उद्योग विभागाचे प्रस्ताव माझ्याकडे येणार की थेट तुमच्याकडेच उद्योगमंत्री देसाईंसह तीन सेना मंत्र्यांकडून मंत्रिमंडळ बैठकीतच मुख्यमंत्र्यावर प्रश्नांचा भडीमार

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील उद्योगासंदर्भात माझ्याकडे खाते आहे. जे कोणी अदानी, अंबानी यांच्या फाईली असतील तर त्या काय थेट तुमच्याकडेच येणार का असा सवाल उपस्थित करत माझ्या विभागाकडेही या फाईली आल्या पाहिजेत अशा स्पष्ट शब्दात शिवसेनेच्या कोट्यातून उद्योग मंत्री असलेले सुभाष देसाई हे मुख्यमंत्र्याचे खास मंत्री म्हणून ओळखले जातात मात्र आज …

Read More »

कर्जमाफी झालीय, मग लाभार्थी कसे सापडत नाहीत खासदार राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या घोषणेचे लाभार्थीच सापडत नसल्याचे सांगत लाभार्थी माहीत होण्यासाठी राज्य सरकारने कर्ममाफीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे केली. मंत्रालयात आज आलेल्या खा. राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना …

Read More »

धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन झाले. धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केली. धर्मा पाटील यांना …

Read More »

शेतकरी धर्मा पाटील यांना मृत्यूनंतरही भरपाईसाठी एक महिन्याची प्रतिक्षा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लेखी आश्वासन

मुंबईः प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांची अधिग्रहीत जमिनीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी दोन वर्षापासून पाठपुरावा करत होते. ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र कठोर काळजाच्या सरकारला त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना तातडीने त्यांच्या जमिनीची नुकसान भरपाई द्यावी असे अद्याप वाटत नसून धर्मा पाटील यांचे वारस नरेंद्र …

Read More »

संविधानाच्या आडून सत्तेच्या मार्गावर जाण्याचा विरोधकांचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विरोधकांच्या संविधान बचाव रँलीवर टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी देशातील आणि राज्यातील भाजपच्या सरकारकडून सबका साथ सबका विकास यानुसार सर्वांना सोबत घेवून विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे यांच्या राजकिय पक्षाची दुकानदारी बंद होण्याची पाळी आल्याने विरोधकांकडून संविधान बचाव रँली सारख्या रँली काढत असून संविधानाच्या आडून सत्तेचा मार्ग चोखाळण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

राज्याने ९ टक्क्याचा विकास दर गाठला समृद्ध, बळकट महाराष्ट्र घडविण्याची राज्यपालांची जनतेला साद

मुंबई : प्रतिनिधी मागील ४ वर्षांमध्ये राज्याने ९ टक्के इतका सरासरी वार्षिक विकास दर गाठलेला असून  राज्याच्या कृषी व कृषी संलग्न क्षेत्राने १२.५ टक्के इतका दोन अंकी विकास दर गाठलेला आहे. कृषीक्षेत्रातील गुंतवणूक ३० टक्क्यांपर्यंत वाढली असून महाराष्ट्राने संपूर्ण देशामध्ये कृषीक्षेत्राच्या विकासात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळाच्या सहाय्याने विदर्भ आणि मराठवाड्याच्या ११ जिल्ह्यांमध्ये विशेष दुग्धव्यवसाय …

Read More »

मी गुन्हेगार आहे का? पाळत ठेवायला विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई : प्रतिनिधी माझ्या घरात साध्या वेशातील पोलिस येवून बसतात. मी काय करतो याची माहिती घेतात. मी काय गुन्हेगार आहे का? पाळत ठेवायला असा सवाल राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करत यासंदर्भात राज्यपालांना भेटून तक्रार करणार असून पोलिसातही तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नरिमन …

Read More »

स्वपक्षात एकटे पडलेले खडसे विस्थापित तर नाही होणार ? भाजपमध्ये एकटे पडलेल्या खडसेंना इतर पक्षात मात्र मुबलक मित्र

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात ४० वर्षे एकाच पक्षात राहून राजकिय विरोधकांशी दोन हात केले. त्याच पक्षाने सत्तेत आल्यानंतर पहिल्या दोन वर्षातच एकनाथ खडसे यांना एखाद्या खड्यासारखे बाजूला सारत स्वपक्षातच एकटे पाडण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खडसे हे भाजपमध्ये एकटे पडल्याचे चित्र पाह्यला मिळत असून त्यांच्यावर विस्थापित होण्याची पाळी …

Read More »