Breaking News

शिंदे-फडणवीस-पवार यांच्या राज्य मंत्रिमंडळात ‘हे’ आहेत मंत्री राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

भाजपाप्रणित एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या नव्या राज्य मंत्रिमंडळात खातेबदल करत तिन्ही पक्षाच्या आमदारांना चांगली खाती देत समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांकडील खाती काढून घेत ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील मंत्र्यांना हस्तांतरीत करण्यात आली. तर भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील अर्थ व नियोजन हे खाते दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द कऱण्यात आले. त्यामुळे या राज्य मंत्रिमंडळाच्या फेरबदलावर नेहमीप्रमाणे अजित पवार यांचाच दबदबा असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेले कृषी खाते काढून ते अजित पवार गटाच्या धनंजय मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आले. तर अब्दुल सत्तार यांच्याकडे अल्पसंख्याक आणि औकाफ हे खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच शिंदे गटाचे संजय राठोड यांच्याकडील अन्न व औषध प्रशासन विभाग काढून तो राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्माराव बाबा आत्राम यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर संजय राठोड यांना मृद व जलसंधारण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपाचे मंत्री अतुल सावे यांच्याकडील सहकार हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात आली. तर अतुल सावे यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृहनिर्माण मंत्री पदाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांना भाजपा मंत्री गिरिष महाजन यांचेकडील वैद्यकीय शिक्षण हे खाते देण्यात आले असून त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालयाचा कारभार कायम ठेवण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादीचे आमदार संजय बन्सोड यांच्याकडे गिरीष महाजन यांच्याकडील क्रिडा व युवक कल्याण आणि शिंदे गटाचे दादा भुसे यांच्याकडील बंदरे ही खाती देण्यात आली आहेत. तर दादा भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम हे महत्वाचे खाते देण्यात आले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कारभार पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर भाजपाचे रविंद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग कायम ठेवण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *