मुंबई: विशेष प्रतिनिधी
एकाबाजूला कोरोना रूग्णांची संख्या वाढीस लागलेली आहे. मात्र प्रशासनाचा गाडा थांबू नये यासाठी मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्द, मालेगांव महानगरपालिका हद्दीतील सर्व शासकिय कार्यालये ५ टक्के कर्मचाऱ्यांवर सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच या कर्मचाऱ्यांनी काम करण्यासाठी कार्यालयात आल्यानंतर संसर्ग होणार नाही या उद्देशाने ३ फूटाचे अंतर ठेवून काम करण्यासही सामान्य प्रशासन विभागाने बजावले आहे.
कार्यालयात येताना तोंडाला मास्क बांधून येणे, वेळोवेळी साबणाने किंवा सॅनिटायर्सने हात धुणे आदी गोष्टी कर्मचारी-अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक कर्मचारी-अधिकाऱ्याने त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय कामाच्या निमित्ताने कार्यालयात येणाऱ्या व्यक्तींनीही या नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कार्यालयीत ५ टक्के कर्मचारी हे रोटेशन पध्दतीने कार्यालयात येवून कामकाज करतील अशी सूचनाही सामान्य प्रशासन विभागाने दिली.
Tags ajit pawar cm uddhav thackeray covid-19 government offices
Check Also
मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक
लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …