मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १० मार्च रोजी पासून लागू झालेली असतानाही राज्यभरातील एसटी बसेस, बस थांबे, पेट्रोल पंपासहित इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सरकारी प्रचाराच्या जाहिराती अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने सरकारला जाब विचारून संबधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे केली.
यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांना पत्र लिहून ही बाब आयोगाच्या निदर्शनास आणून दिली.
Tags cm fadnavis congress diwakar raote loksabha election pm narendra modi sachin sawant
Check Also
नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही
लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …