Breaking News

Tag Archives: sanjay raut

संजय राऊत यांना समन्स, हाजीर हो

पत्राचाळ प्रकरणी नुकतेच शिवसेना खासदार संजय राऊत यांना अलीकडेच जामीन मिळाला. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा राजकियदृष्ट्या सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे. ३० मार्च २०१८ मध्ये बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव न्यायालयाने राऊतांना समन्स बजावले असून १ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर …

Read More »

राज ठाकरेंच्या त्या टीकेवर संजय राऊत म्हणाले, मॅच्युअर झालात थोडं पुढे पहा…

आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या तोंडावर मनसेच्या गटप्रमुखांचा मेळावा गोरेगांव येथील नेस्को मैदानावर पार पडला. या मेळाव्या दरम्यान राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांच्यासह राहुल गांधी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठविली. तसेच या तिघांच्या बोलण्याची नक्कलही करून दाखविली. त्यावरून शिवसेना (उध्दव ठाकरे गट) प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरे …

Read More »

संजय राऊत म्हणाले, त्यांना कामाख्या देवीने बोलावलं पण आम्हाला नाही कधी बोलावलं…

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, त्यांच्या पाठोपाठ भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही आक्षेपार्ह विधान केले. या विधानावरून काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेने जोरदार टीका केली. तरीही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यपालांबद्दल कोणतीच कारवाई केली नाही. नेमक्याच परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदार-खासदारांनी गुवाहाटीचा दौरा केला. या दौऱ्यावरून उध्दव ठाकरे गटाचे …

Read More »

संजय राऊत यांचा खोचक सवाल, महाराष्ट्राचे देव संपले का?

राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकल्यानंतर आज पहिल्यांदाच शिवसेनेकडून बुलढाण्यातील चिखली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यानिमित्त उध्दव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्याचा चांगलाच समाचार घेत म्हणाले, मुख्यमंत्री आज नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. महाराष्ट्राचे देव …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, ज्याला स्वत:च भविष्य माहित नाही तो आपलं भविष्य ठरविणार

आपला नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले. तोच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल करत म्हणाले की, काल परवा ते स्वत:च भविष्य बघायला हात दाखवायला गेले. आज काय तर म्हणे गुवाहाटीला नवस …

Read More »

ईडीचे वाईट दिवसः न्यायालय म्हणते संजय राऊतांच्या जामीनावरील याचिका ऐकू शकत नाही

पीएमएलए अर्थात ईडी न्यायालयाने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या कथित पत्रा चाळ प्रकरणी जामीन मंजूर केला. मात्र ईडीने याप्रकरणी तातडीने संजय राऊत यांच्या जामीनाला स्थगिती मिळावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु त्यावेळी उच्च न्यायालयाने पीएमएलए न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास निकाल दिला. त्यानंतर पुन्हा एकदा ईडीने सुधारीत याचिका दाखल करत …

Read More »

संजय राऊत म्हणाले, छत्रपतींनी माफी मागितली तर मोदी जयजयकार का करतात?

काल दिवसभरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजाविषयी अवमानकारक वक्तव्ये केली. त्यावरून उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी माफी मागितली तर मग महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

संजय राऊत यांचा सवाल, आता ते जोडे कोणाला मारणार भाजपा प्रवक्ता की राज्यपालांना?

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिंदे गट, मनसे आणि भाजपाने राहुल गांधी यांच्यासह शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. तसेच राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. मात्र महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे वक्तव्य भाजपा प्रवक्ते आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. त्यावरून उध्दव …

Read More »

संजय राऊत यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल, कुठे गेला आता तुमचा स्वाभिमान?

तीन-चार दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्यावर टीका केली. राहुल गांधी यांच्या या टीकेवर राज्यात चांगलेच रणकंदन माजले. त्यामुळे राज्यातील राजकिय वातावरण ऐन थंडीतही चांगलेच तापले. त्यातच आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने उध्दव …

Read More »

संजय राऊतांची स्पष्टोक्ती, अन्यथा देशाचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता

मागील तीन-चार दिवसांपासून भारत जोडो यात्रे दरम्यान आणि नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा.वि.दा सावरकर यांच्या माफीनाफ्यावरून टीका केल्याने राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका करताना थेट पंडित नेहरू यांच्यावर टीका केली. या टीकेला उध्दव ठाकरे गटाचे …

Read More »