Breaking News

Tag Archives: election commission of india

राज्यातील राजकिय पक्षांच्या दिवाळ-दिवाळीच्या मौसमाला सुरुवात निवडणूक आचारसंहिता लागू

नवी दिल्ली -मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या विधानसभेचा कालावधी ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपत असल्याने तत्पूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य विधानसभेसाठी निवडणूकांची आचारसंहिता आजपासून लागू होत असून २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी यासाठी मतदार तर २४ ऑक्टोंबरला निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने सत्तेत विराजमान होणारा राजकिय पक्ष दिवाळी साजरी …

Read More »

पालघर आणि भिवंडीमध्ये होणार निकालाच्या सर्वाधिक ३५ फेऱ्या लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकांचे २३ मे रोजी निकाल येणार आहेत. राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी पालघर आणि भिवंडी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच ३५ निवडणूक मतमोजणी निकाल फेऱ्या होतील. पालघर आणि भिवंडी – गोंदिया आणि ठाणे मतदारसंघात एकूण ३३ निवडणूक निकाल फेऱ्या तर बीड आणि शिरुर मतदारसंघात एकूण ३२ निवडणूक निकाल फेऱ्या …

Read More »

निवडणूक आयोग मोदींच्या दावणीला बांधलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी लोकशाहीवरचा विश्वास जनतेमध्ये निर्माण करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे.परंतु देशाचा निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दावणीला बांधलेला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅट संदर्भातील याचिका फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. व्हीव्हीपॅट व निवडणूक मशीन यात तफावत होण्याची …

Read More »

व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी रस्त्यावर उतरा आ. जितेंद्र आव्हाड यांचे आवाहन

ठाणे : प्रतिनिधी व्हीव्हीपॅटच्या मोजणीसंदर्भात सुमारे २१ राजकिय पक्षांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. हा निर्णय अत्यंत दुर्देवी असून व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी व्हावी, यासाठी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले. लोकसभा निवडणुकांमध्ये पन्नास टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी …

Read More »

दुष्काळ निवारणासाठी राज्यातील आचारसंहिता शिथिल केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याचा निर्णय निवडणूक आय़ोगाने घेतला. आचारसंहिता शिथिल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून आयोगाकडे मागणी केली होती. राज्यातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून यासंदर्भात विविध …

Read More »

आचारसंहिता भंग करणाऱ्या पंतप्रधानांवर आयोगाने कारवाई करण्याची हिंमत दाखवावी! काँग्रेस प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे घटना, कायदे, प्रथा व परंपरा मानणारे म्हणून कधीच प्रसिद्ध नव्हते. या निवडणुकांच्या काळात देखील त्यांनी हेच सिद्ध करण्याचा चंग बांधला आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केला आहे. मिरवणुकीने मतदानाला जाणे किंवा मतदान करुन आल्यानंतर एक …

Read More »

१४ मतदारसंघात दुपारपर्यंत ३५.७० टक्के मतदान कोल्हापूरात दुपारपर्यंत ४२ टक्के मतदान

मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३५.७० टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. तर सर्वाधिक मतदान कोल्हापूरात झाले आल्याचे त्यांनी सांगितले. १४ लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत झालेले मतदान : जळगाव ३३.१२ टक्के, रावेर ३५.१५ टक्के, जालना ३७.९१ टक्के, …

Read More »

चौथ्या टप्प्यात २८६ पुरूष आणि ३७ महिला उमेदवार १७ लोकसभा मतदारसंघामध्ये ३२३ उमेदवार

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी राज्यातील मतदानाच्या चौथ्या टप्प्यात १७ मतदार संघामध्ये ३२३ उमेदवार राहिले आहेत. यात २८६ पुरूष तर ३७ महिला उमेदवार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. मतदार संघनिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. नंदूरबार – ११ उमेदवार (९ पुरूष,२ महिला), धुळे- २८ (२५पुरूष,३ महिला), दिंडोरी-८ (७ पुरूष, १ महिला), नाशिक-१८(१५पुरूष, ३ महिला),पालघर- १२ (११ पुरूष, १ महिला), भिवंडी-१५ (१५पुरूष,० महिला), कल्याण-२८(२५पुरूष, ३ महिला), ठाणे-२३(२१ पुरूष, २ महिला), मुंबई उत्तर-१८(१७ पुरूष, १ महिला), मुंबई उत्तर-पश्चिम-२१ (१९ पुरूष,२ महिला), मुंबई उत्तर …

Read More »

राज्यातील मतदार याद्यांमधून ४० लाख नावे गायब मा.न्या.कोळसे-पाटील यांचा आऱोप

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा एकदा केंद्रातील भाजपला फायदा व्हावा यासाठी राज्यातील मतदार यांद्यामधील ४० लाख नावे गायब करण्यात आल्याचा आरोप जनता दलाचे औरंगाबादचे उमेदवार तथा माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांनी केला. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रे लँब टेक्नोशियन आणि “No voter left behind” अभियान चालविणारे सयद खालीद सैफुल्लाह यांनी …

Read More »

महाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार सर्वात जास्त मतदार ठाण्यात तर रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महिला मतदार सर्वाधिक

मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची सर्वाधिक आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरूषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून १४ लाख ४० हजार एकूण मतदारांमध्ये …

Read More »