केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बहुचर्चित निवडणूक रोख्यांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. यामध्ये सर्वांत जास्त लाभ भाजपाला झाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर तृणमूल काँग्रेस, काँग्रेस यांचा नंबर दिसून येत आहे. या सर्व घडामोडीवर माध्यमांवर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया एक्स या सोशल मायक्रो ब्लॉगिंगवर नोंदवली.
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, केंद्र सरकारची २०१८ ची इलेक्टोरल बाँड्स योजना देशातील आजपर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा ठरला आहे; भाजपने इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून एकूण ६ हजार ६० कोटी रुपये कमावल्याची टीका केली आहे. तसेच, आता भाजप-आरएसएस सरकारने कंपन्यांना इलेक्टोरल बाँड्ससाठी काय ऑफर दिली हे पाहणे मनोरंजक ठरणार असल्याचेही सांगितले.
The Union’s 2018 Electoral Bonds Scheme is the biggest scam the country has witnessed till date; BJP garnered a total of ₹6060 crore through electoral bonds.
It will be interesting to see what quid pro quo was offered for the electoral bonds by that the BJP-RSS government to… pic.twitter.com/DockDw7Wti
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 15, 2024
दुसऱ्या एका ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपा आणि मोदी सरकारची पोलखोल करताना, निव्वळ नफ्यामध्ये २१५ कोटी असलेल्या कंपनीने १ हजार ३६८ कोटींचे इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणे कसे शक्य आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, निव्वळ नफ्यामध्ये फक्त १० कोटी असलेल्या आणखी एका कंपनीने १८५ कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. घोंचू मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि त्यांच्या भ्रष्ट गुंडांना तुरुंगात टाकले पाहिजे अशी मागणीही केली.
Scam 2018-2024 : The BJP and Narender Modi Story
How is it possible that a company with ₹215 crore in net profit purchased electoral bonds worth ₹1,368 crores?
Another company with only ₹10 crores in net profit purchased electoral bonds worth ₹185 crores!
घोंचू Modi-led… pic.twitter.com/xeMKCWZJ1x
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 15, 2024