मुंबईः प्रतिनिधी
अब की बार २२० पारचा नारा देत भाजपा-शिवसेनेने निवडणूकीची घोषणा होण्याआधीच प्रचारात आघाडी घेतली. तसेच मागील पाच वर्षात केलेल्या कामाचा हिशोब देण्यासाठी महाजनादेश, जनआर्शीवाद यात्रा काढल्या. मात्र या यांत्रांचा परिणाम काही राज्यातील जनतेवर झालेला नसून यात भाजपा-शिवसेनेचे ५ विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे दिसून येत आहे.
राज्य मंत्रिमंडळातील महिला व बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री बाळा भेगडे, जनसंधारण मंत्री राम शिंदे या भाजपाच्या मंत्र्यांबरोबरच शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जयदत्त क्षीरसागर यांचाही पराभव या निवडणूकीत झाला. याबरोबरच कृषीमंत्री अनिल बोंडे, माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आदीवासी राज्यमंत्री परिणय फुके आदी मंत्रीही पराभूत झाले.
Tags arjun khotkar bala bhegade maharashtra vidhansabha -2019 pankaja munde ram shinde vijay shivtare
Check Also
अमित शाह यांचे शरद पवार यांना आव्हान
अमरावतीच्या भाजपा-महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याबद्दल अमरावतीकरांची माफी मागण्याऐवजी,केंद्रात कृषीमंत्री असूनही शेतकऱ्यांसाठी, विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी काहीच …