Breaking News

अंधेरीचा विघ्नहर्ता मुंबापुरीतला २२ फुटांचा कागदापासून बनवलेला पहिला गणराज

मुंबई उपनगरात अंधेरीचा विघ्नहर्ता म्हणून ख्याती पावलेला बाळगोपाळ मित्र मंडळाचा गणेशोत्सव यंदा वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. कोव्हिडंनंतर पर्यावरण पूरक उत्सवाची कास धरताना मंडळाने यंदा सुमारे २२ फुटांची कागदी गणेशमूर्ती स्थापन केली आहे.

बाळगोपाळ मित्र मंडळ यावर्षी ४९ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. अंधेरीच्या पूर्व भागातील प्रकाशवाडी परिसरात त्यावेळी कामगारवर्ग मोठया प्रमाणात रहात होता. १९७४ साली मधुकर जांभळे, सुरेश भावंगीर, प्रेमानाथ वऱ्हाडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत गणेशोत्सव सुरु केला. त्यानंतर आजतागायत कुठल्याही विघ्नाशिवाय हा उत्सव सुरु आहे. कोव्हिडं काळात ही शासकीय नियम पाळून मंडळाने गणेशोत्सव साजरा केला. कोव्हिडं काळातली एकूण परिस्थिती पाहिल्यावर पर्यावरण पूरक गणेशोत्सव करण्याचा निर्णय मंडळाचे विद्यमान पदाधिकारी विक्रम सिंग,जय जाधव, लॉरेन्स डेव्हिड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. त्यानुसार यावेळी सुमारे २२ फुटांची कागदापासून बनवलेला गणराज स्थापन करण्यात आला. मूर्तिकार राजेश मयेकर यांनी दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर ही भव्य मूर्ती साकारली आहे.

विद्यार्थ्यांनी अर्पण केला सोन्याचा दात

अंधेरीचा विघ्नहर्ता म्हणून ओळख पावलेल्या गणरायाने परिसरातीलच नव्हे तर इतरांनाही आपली प्रचिती दाखवून दिली आहे. परिसरातील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना काही अडचण, समस्या जाणवत होती. त्यावेळी त्यांनी गणरायाला साकडं घालत संकटातून सोडवण्यासाठी प्रार्थना केली. आपल्यावरील विघ्न टळल्यावर या विद्यार्थ्यांनी घरुन मिळणारा पॉकेटमनी एकत्र केला. पण हे पैसे कमी पडणार हे लक्षात आल्यावर त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना पैसे कशासाठी गोळा केलेत याची कल्पना दिली. त्यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जास्तीची रक्कम आपल्याकडून देत विद्यार्थ्यांच्या वतीने गणरायाला सोन्याचा दात अर्पण केला. असा अनुभव कित्येक भक्तांना आल्यामुळे त्यांनी अंधेरीचा विघ्नहर्ता अशी उपाधीच दिली. गणेशोत्सव काळात मंडळातर्फे विविध उपक्रम राबवले जातात. मोफत नेत्र, शारीरिक तपासणी,रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. याशिवाय विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर, महिलांकरता वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती करुन दिली जाते.

अंधेरीचा विघ्नहर्ता
बाळगोपाळ मित्र मंडळ, प्रकाशवाडी, अंधेरी पूर्व.
संपर्क – जय जाधव (सचिव),मोबाईल -7977514380.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

भल्या पहाटे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून प्रदूषण नियंत्रण कामाची प्रत्यक्ष पाहणी मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढविण्याच्या महानगरपालिकेला सूचना

शहरात काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तसेच स्वच्छतेच्या कामाची मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *