रायगड जिल्हा मोठा असून डोंगराळ प्रदेशाचा आहे. या जिल्ह्यात नागरिकांना सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढविण्याच्या अनुषंगाने महाड येथे २०० खाटांचे रूग्णालय उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले. मंत्रालयीन दालनात महाड येथे रूग्णालय …
Read More »राज्यात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान आयुष्यमान भव मोहीम केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची माहिती
राज्यात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘आयुष्यमान भव’ मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भारताला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त भारत बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. आरोग्य भवन येथील सभागृहात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »आरोग्य विभागातील भरतीप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे निर्देश
राज्य शासनाच्या ७५ हजार पदभरती धोरणांतर्गत आरोग्य विभागातील सुमारे ११ हजार जागांची भरतीप्रक्रिया सुरू आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया सुरू आहे. ही भरतीप्रक्रिया सुरळीत, पारदर्शी व विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिले. आरोग्य विभागाच्या भरतीप्रक्रियेबाबत आयोजित …
Read More »रुग्ण सेवा, मनुष्यबळ नियंत्रणासाठी ‘वॉर रुम’ तयार करा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आदेश
आरोग्य विभागांतर्गत जिल्हा रुग्णालयापासून ते उपकेंद्रापर्यंत आरोग्य यंत्रणा कार्यरत आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून रूग्ण सेवा देण्यात येते. प्रभावी रुग्ण सेवेसाठी उपकेंद्र आता ‘हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर’मध्ये रूपांतरीत करण्यात आली आहे. या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी देण्यात आले आहेत. आरोग्य विभागातंर्गत देण्यात येणारी रुग्ण सेवा, मनुष्यबळ व्यवस्थापन नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ तयार …
Read More »राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गतची कामे कालमर्यादेत पूर्ण करा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे निर्देश
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सोयीसुविधांची कामे सुरू आहेत. ही कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण करून जनतेच्या सेवेत रूजू करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिले. मंत्रालयीन दालनात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पायाभूत सोयीसुविधा विकास शाखेच्या बैठकीत मंत्री डॉ. सावंत …
Read More »खुशखबर! आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू… आरोग्य विभागात ११ हजार पदं भरली जाणार आहेत. भरतीप्रक्रियेसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभाग भरती ही माहिती दिली
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास ११ हजार पदांसाठीची जाहिरात आज आली आहे. राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. आरोग्य विभाग ग्रुप क आणि ग्रुप ड या दोन विविध जिल्ह्यांच्या जाहिराती आज म्हणजेच मंगळवारी प्रसिद्ध झाल्या आहेत. या भरती अंतर्गत गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा …
Read More »जे जे रुग्णालयात यकृत रोपण सुविधा उपलब्ध करुन देणार मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात सर ज. जी. (जे.जे.) रुग्णालयात यकृत रोपण सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. सर ज.जी.रुग्णालयात विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे …
Read More »आरोग्य विभागात होणार तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती प्रक्रिया आरोग्यमंत्री डॉ सावंत यांच्या पुढाकाराने भरती प्रक्रियेला आला वेग
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु होणार आहे. तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती यामध्ये केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांनी दिली. तत्कालीन सरकारच्या काळात २०२१ साली आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही …
Read More »Medical Expense : वैद्यकीय उपचारांचा खर्च ५ वर्षात झाला दुप्पट… महागाईत दरवर्षी १४% दराने वाढ
एक तर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढला आहे. तसेच कोविड काळापासून रुग्णालयातील उपचारही महाग झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत कोणत्याही आजारामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर Medical Expense उपचारांवर होणारा खर्च दुपटीने वाढला आहे.संसर्गजन्य रोग आणि श्वसनविकारांवर उपचारासाठी विम्याचे दावे झपाट्याने वाढले आहेत. एकीकडे महागाई दर ७ टक्क्यांच्या …
Read More »“टिबी मुक्त पंचायत” उपक्रमाचा रायगड जिल्ह्यापासून शुभारंभ क्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक- आरोग्यसेवा आयुक्त धीरजकुमार
राज्य क्षयरोगमुक्त करण्याचा आरोग्य मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत यांचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मिशन मोडवर काम करावे. राज्य क्षयरोग मुक्त करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार यांनी केले. आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे आयोजित “टीबी मुक्त पंचायत” अभियान उपक्रमाचा शुभारंभ आयुक्त धीरज कुमार …
Read More »