Breaking News

आठ दिवसात राज्यात १० हजाराने वाढ होत संख्या २५ हजारावर आज १४९५ नव्या रूग्णांचे निदान तर ५४ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत असून मागील १० दिवसात राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजार ३९७ ने वाढली आहे. २४ तासात १४९५ नव्या रूग्णांचे निदान आज झाले असून ५४ जणांच्या मृत्यूची नोंदही आजच झाली आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत राज्यातील रूग्णांची संख्या २५ हजार ९२२ वर पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मागील ८ दिवसांपासून राज्याच्या रूग्णसंख्येत १ हजाराने वाढ तर कधी १२०० तर १४०० अशी वाढ होत होती.
( टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २२० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. )
मृत्यू –
आज राज्यात ५४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ४०, पुण्यात ६, जळगावमध्ये २ , सोलापूर शहरात २, औरंगाबाद शहरात २, वसई विरारमध्ये १ तर १ मृत्यू रत्नागिरीमध्ये झाला आहे.
मृत्यूंबद्दल अधिकची माहिती –
आज झालेल्या मृत्यूंपैकी ३३ पुरुष तर २१ महिला आहेत. आज झालेल्या ५४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत तर २१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ५४ रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ९७५ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या –
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,३०,८५७ नमुन्यांपैकी २,०३,४३९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २५,९२२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १४३९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १३,८०३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५७.६५ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे –
१. आजपर्यंत राज्यातून ५५४७ रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
२. सध्या राज्यात २,९८,२१३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १४,६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       १५७४७ ५९६
ठाणे           १५७
ठाणे मनपा ११२२ ११
नवी मुंबई मनपा १०१८
कल्याण डोंबवली मनपा ४१२
उल्हासनगर मनपा ७२
भिवंडी निजामपूर मनपा ३९
मीरा भाईंदर मनपा २४५
पालघर ४०
१० वसई विरार मनपा २८६ ११
११ रायगड १५८
१२ पनवेल मनपा १५०
ठाणे मंडळ एकूण १९४४६ ६४४
१३ नाशिक ८८
१४ नाशिक मनपा ४६
१५ मालेगाव मनपा ६१७ ३४
१६ अहमदनगर ५४
१७ अहमदनगर मनपा १०
१८ धुळे
१९ धुळे मनपा ६२
२० जळगाव १६२ १७
२१ जळगाव मनपा ४४
२२ नंदूरबार २२
नाशिक मंडळ एकूण १११४ ७१
२३ पुणे १८०
२४ पुणे मनपा २८३० १६१
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५१
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा ३११ २१
२८ सातारा १२५
पुणे मंडळ एकूण ३६०६ १९३
२९ कोल्हापूर १६
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली ३५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग
३४ रत्नागिरी ६०
कोल्हापूर मंडळ एकूण १३०
३५ औरंगाबाद ९४
३६ औरंगाबाद मनपा ५८६ १७
३७ जालना १६
३८ हिंगोली ६१
३९ परभणी
४० परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण ७५९ १८
४१ लातूर ३२
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा ५२
लातूर मंडळ एकूण ९४
४७ अकोला १८
४८ अकोला मनपा १७४ ११
४९ अमरावती
५० अमरावती मनपा ८४ ११
५१ यवतमाळ ९९
५२ बुलढाणा २५
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण ४०८ २६
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ३१५
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
नागपूर एकूण ३२४
इतर राज्ये ४१ १०
एकूण २५९२२ ९७५

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *