Breaking News

राज्यात तीन हजारच्या जवळपास रूग्ण तर ९९ जणांचा मृत्यू अॅक्टीव्ह रूग्ण ३४ हजार ८८१ तर एकूण संख्या ६५ हजारावर

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात कोरोनाग्रस्त २ हजार ९४० नव्या रूग्णांचे निदान झाले असून ९९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ हजार ८४ रूग्ण बरे होवून घरी गेले असून घरी जाणाऱ्यांची संख्या २८ हजारावर पोहोचली असून राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ६५ हजार १६८ वर पोहोचली आहे. तर मृतकांच्या संख्येने आतापर्यंत २१०० ची संख्या पार केल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध-
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, धुम्रपान करणाऱ्यास मुंबई पोलिस अधिनियम नुसार पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल. त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या गुन्ह्यासाठी ३ हजार रुपये दंड व तीन दिवस सार्वजनिक सेवा आणि तिसऱ्या व त्यानंतरच्या  गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये दंड व ५ दिवस सार्वजनिक सेवा अशा शिक्षेची तरतूद आहे. भारतीय दंड संहितनेनुसार  विविध कलमांनुसार सहा महिने, २ वर्ष शिक्षा व दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. या अनुषंगाने २९ मे रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. जनतेने या नियमाचे मनापासून पालन करुन करोनासह इतर अनेक साथरोगाच्या प्रसारास आळा घालण्यास हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
काही महत्वाच्या नोंदी –● राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.३ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १७.१ दिवस आहे. ●राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.०७ % एवढे आहे.
● राज्यातील मृत्यू दर – ३.३७ % ● सध्या राज्यात ५,५१,६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२,६८१ खाटा उपलब्ध असून सध्या ३५,४२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६२ पुरुष तर ३७ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ९९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४८ रुग्ण आहेत तर ४९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २ जण ४० वर्षांखालील आहे. या ९९ रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २१९७ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे ६ मे ते २७ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ५९ मृत्यूंपैकी मुंबई ३५, पनवेल -७, ठाणे -६, वसई विरार – ६, नवी मुंबई -२, कल्याण डोंबिवली -१ जळगाव- १ तर १ मृत्यू इतर राज्यातील आहे .

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ८१ मुंबई -५४, वसई विरार -७, पनवेल ७, ठाणे – ६, रायगड – ३ ,नवी मुंबई -२, कल्याण डोंबवली -२.
नाशिक जळगाव -३
पुणे १२ पुणे  -६, सोलापूर -६
नागपूर नागपूर -१
इतर राज्ये राजस्थान येथील एक मृत्यू पनवेल मध्ये तर बिहार येथील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.

 

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ३८४४२ १६३६४ १२२७ २०८४५
ठाणे ९१२३ २९७३ १८२ ५९६८
पालघर ९६८ ३२९ ३० ६०९
रायगड १०४२ ५४९ ३९ ४५२
नाशिक ११११ ८९३ ६० १५८
अहमदनगर १०८ ५७ ४५
धुळे १४० ७१ १६ ५३
जळगाव ६०७ २७२ ७२ २६३
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ३४ २० ११
१० पुणे ७५३७ ३५५९ ३२० ३६५८
११ सोलापूर ८७२ ३५३ ६८ ४५१
१२ सातारा ४९० १४८ १६ ३२६
१३ कोल्हापूर ४२९ १०४ ३२१
१४ सांगली ११२ ५५ ५६
१५ सिंधुदुर्ग ३३ २६
१६ रत्नागिरी २४२ ९० १४७
१७ औरंगाबाद १४६२ ९८६ ६५ ४११
१८ जालना ११९ ४५ ७४
१९ हिंगोली १४९ ९७ ५२
२० परभणी ५७ ५३
२१ लातूर ११८ ५५ ६०
२२ उस्मानाबाद ६६ १८ ४८
२३ बीड ४६ ४१
२४ नांदेड १०८ ८६ १६
२५ अकोला ५७१ २८९ २८ २५३
२६ अमरावती २१३ १२१ १६ ७६
२७ यवतमाळ १३० ९२ ३८
२८ बुलढाणा ५८ २९ २६
२९ वाशिम
३० नागपूर ५५६ ३५३ १० १९३
३१ वर्धा ११ १०
३२ भंडारा २९ २८
३३ गोंदिया ६१ २८ ३३
३४ चंद्रपूर २५ १५ १०
३५ गडचिरोली ३२ २४
  इतर राज्ये /देश ५९ १५ ४४
  एकूण ६५१६८ २८०८१ २१९७ ३४८८१

( टीपआय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ३११ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.)

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *