Breaking News

यंदाच्या दिवाळीत देशभरात ३.७५ लाख कोटींची खरेदी

यंदा दिवाळीत जोरदार मागणी असल्याने देशभरातील बाजारपेठांमध्ये ३.७५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्रमी व्यवसाय झाला आहे. गोवर्धन पूजा, भाऊबीज, छठ पूजा आणि तुळसी विवाह हे सण अद्याप यायचे आहेत. या सणांमध्ये ५० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी एक निवेदन जारी करून यंदाच्या दिवाळीत व्यवसायाची आकडेवारी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वोकल फॉर लोकलची जादू लोकांच्या मनावर कामाला आली आहे. यामुळे देशातील वस्तूंची विक्रमी विक्री झाली. त्यामुळे चीनला १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. याआधी दिवाळीच्या सणात चीनमधून बनवलेल्या वस्तूंना भारतीय बाजारपेठेतील ७० टक्के हिस्सा मिळत असे. मात्र, यंदा तशी परिस्थिती नव्हती. देशातील व्यापाऱ्यांनी यंदा चीनमधून दिवाळीशी संबंधित कोणत्याही वस्तू आयात केल्या नाहीत.

प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, ३.५ लाख कोटी रुपयांच्या सणासुदीच्या व्यवसायात सुमारे १३ टक्के अन्न आणि किराणा, ९ टक्के दागिने, १२ टक्के कापड आणि वस्त्रे, ४ टक्के सुका मेवा, मिठाई आणि नमकीन, ३ टक्के घर सजावट, ६ टक्के सौंदर्य प्रसाधने, ८ टक्के इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल, ३ टक्के पूजासामुग्री आणि पूजा साहित्य, ३ टक्के भांडी आणि स्वयंपाकघरातील भांडी, २ टक्के मिठाई आणि बेकरी, ८ टक्के भेटवस्तू, ४ टक्के फर्निशिंग आणि फर्निचर आणि उर्वरित २० टक्के ऑटोमोबाईल, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल, खेळण्यांसह इतर वस्तू आणि सेवांवर ग्राहकांनी खर्च केला.

यापूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशीही ३० हजार कोटी रुपयांच्या सोन्या-चांदीची खरेदी-विक्री झाली होती. सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीचा आकडा केवळ २७,००० कोटी रुपये होता. तर २०२२ मध्ये धनत्रयोदशीला सोन्या-चांदीचा व्यवसाय २५,००० कोटी रुपयांचा होता.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

देशातील ३ सरकारी बँकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एफडीवर व्याज वाढवले असे आहेत व्याजदर

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी अलीकडेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *