Breaking News

शनिवारच्या तुलनेत ५० टक्क्याने संख्या कमी, पण ८ हजाराचा टप्पा ओलांडला राज्यात ८०६८ वर पोहोचली संख्या: १९ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत काल शनिवारी अचानक ८ चा टप्पा पार केल्यानंतर सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यातच आज रविवारी या संख्येत पुन्हा कितीने वाढ होती याबाबत भीतीचे वातावरण होते. मात्र गेल्या २४ तासात कोरोनाचे रूग्ण निदानाचे संख्या ५० टक्क्याने कमी होत ४४० रूग्णांचे निदान झाले. तर १९ रूग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ११८८ रूग्ण बरे होवून घरी परतल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई शहरातील रूग्ण संख्येने ५ हजाराचा टप्पा ५४०७ वर संख्या पोहोचली असून ठाणे, रायगड आणि पालघर अशी मिळून ही संख्या ६ हजार ३४३वर पोहोचली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८०६८ हजारवर पोहोचली.
आज राज्यात १९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १२, ३ पुणे महानगरपालिका येथे तर २ मृत्यू जळगाव येथे, १ सोलापूर शहरात तर १ लातूर येथे झाला आहे.
मृत्यूंबद्दल अधिकची माहिती –
आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७ रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर २ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी ४ रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. उर्वरित १५ रुग्णांपैकी ११ जणांमध्ये (७३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३४२ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या –
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,१६,३४५ नमुन्यांपैकी १,०७,५१९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८०६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ६०४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ८६०३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३३.७२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे
1. आजपर्यंत राज्यातून ११८८ रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
2. सध्या राज्यात १,३६,९२६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ९,१६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ५४०७ २०४
ठाणे ७३८ १४
पालघर १४१
रायगड ५७
मुंबई मंडळ एकूण ६३४३ २२३
नाशिक १३१ १२
अहमदनगर ३६
धुळे २५
जळगाव १९
नंदूरबार ११
नाशिक मंडळ एकूण २२२ २२
१० पुणे १०५२ ७६
११ सोलापूर ४७
१२ सातारा २९
पुणे मंडळ एकूण ११२८ ८३
१३ कोल्हापूर १०
१४ सांगली २७
१५ सिंधुदुर्ग
१६ रत्नागिरी
कोल्हापूर मंडळ एकूण ४६
१७ औरंगाबाद ५०
१८ जालना
१९ हिंगोली
२० परभणी
औरंगाबाद मंडळ एकूण ६१
२१ लातूर
२२ उस्मानाबाद
२३ बीड
२४ नांदेड
लातूर मंडळ एकूण १४
२५ अकोला २९
२६ अमरावती २०
२७ यवतमाळ ४८
२८ बुलढाणा २१
२९ वाशिम
अकोला मंडळ एकूण ११९
३० नागपूर १०७
३१ वर्धा
३२ भंडारा
३३ गोंदिया
३४ चंद्रपूर
३५ गडचिरोली
नागपूर एकूण ११०
इतर राज्ये २५
  एकूण ८०६८ ३४२

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *