Breaking News

फळबाग विमाचा पुढील २ वर्षाचा करार रद्द २०१९ च्या निकषाप्रमाणे नवीन निविदा काढाव्यात-डॉ. अनिल बोंडे यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे सरकारनी हवामानावर आधारित फळबाग विमा योजनाचे हवामानाचे निकष बदलवुन विमा कंपन्या सोबत २०२० ते २०२२ पर्यंत ३ वर्षाचा करार केला होता. या कराराने शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही फक्त कंपन्या मालामाल झाल्या. भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटविल्यानंतर शेवटी शासनाने माघार घेतली. आणि २०२१ व २०२२ वर्षाकरिता विमा कंपन्यासोबत केलेला करार रद्द केल्याची माहिती भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी देत भाजपाच्या लढ्याला प्राथमिक यश मिळाल्याचा दावाही केला.

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये फळबाग विमा योजना शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरली होती. उद्धव ठाकरे सरकार सत्तेत आल्या बरोबर हवामानावर आधारित विमा योजनेचे निकष बदलविले. २०१९ मध्ये फळबाग विमा योजनेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मृगबहार २०१९ मध्ये २९० कोटी रुपयाचे विमा हप्ते भरण्यात आले होते. आणि शेतकऱ्यांना विमा परताव्या पोटी २९४ कोटी म्हणजे १०१.५% प्राप्त झाले होते. रब्बी फळबाग करिता ११२४रु. विमा हप्ता भरण्यात आला होता. शेतकऱ्यांना ८३१ कोटी रुपयाची म्हणजे ७३.९३% विमां कंपन्याकडून नुकसानभरपाई मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे सरकारने हवामानाचे निकष बदलविल्यानंतर मृगबहार २०२० मध्ये २१५ कोटी रुपयांचा विमा हप्ता २ लाख १२ हजार शेतकऱ्यांनी भरला होता. परंतु कंपनी धार्जिन्या निकषामुळे फक्त १२ हजार ९० शेतकऱ्यांना २२ कोटी रुपये नुकसानभरपाई मिळाली. विमा कंपन्यांना ठाकरे सरकारने १९३ कोटी रुपयांचा नफा मिळवुन दिल्याचा आरोप करत आंबिया बहार २०२० मध्ये ४७७ कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला होता. १६९ कोटी रुपयाची म्हणजे ३५.४२% नुकसानभरपाई दिली. कंपन्यांचा ३०८ कोटी रुपयाचा फायदा झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

२०१९

मृग बहार

 

२०२०

मृग बहार

 

२०१९

अंबिया

२०२०

अंबिया बहार

विमाहप्ता शेतकरी केंद्र राज्य मिळुन २९० कोटी २१५ कोटी ११२४ कोटी   ४७७ कोटी

 

शेतकऱ्यांना दिलेली नुकसानभरपाई २९४ कोटी २२ कोटी ८३१ कोटी १६९ कोटी

 

प्रतिशत नुकसान भरपाई १०१% ८.८% ७३.३९% ३५.४२%

 

 

भारतीय जनता पक्ष किसान मोर्चानी विम्याच्या प्रश्नी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राळ  उठविली. शासनाने २०२१ व २०२२ साठी विमाकंपनीसोबतचे करार रद्द केले. परंतु या कृतीने २०२० मध्ये शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे २०१९ चे देवेंद्र फडणवीस सरकारचेच निकष लावुन २०२० चा विमा शेतकऱ्यांना द्यावा २०२१ व २०२२ साठी फळबाग विमा करार करतांना देवेंद्र फडणवीस शासनाचे वेळीचे हवामानाचे निकष ग्राह्य धरूनच करार करावा अशी मागणीही त्यांनी केली.

हीच फसगत खरीप व रब्बी विम्यामध्ये उंबरठा उत्पादकता कमी करून करार केल्यामुळे झाली आहे. खरीप विम्यामध्ये फक्त १५ लाख शेतकऱ्यांना तुटपुंजा लाभ मिळाला १२३ लाख शेतकरी विम्यापासून वंचित राहिले. विमा कंपन्यांना उद्धव ठाकरे सरकारनी ४२३४ कोटी रुपयाचा नफा मिळवून दिला. कमी केलेले उंबरठा उत्पादकता पुढील दोन वर्षासाठी कायम राहणार आहे. आता तरी सरकारनी चुक सुधारावी २०१९ चे देवेंद्र फडणवीस शासनाने उंबरठा उत्पादकता ग्राह्य धरून २०२० चा विमा शेतकऱ्यांना द्यावा. व पुढील २ वर्षी करिता विमा कंपन्याबरोबरचा अन्यायपुर्ण करार रद्द करून ९०% जोखीम स्तराप्रमाणे उंबरठा उत्पादकते नुसार करार करावा अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *