Breaking News

हवामान

पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही पश्चिम घाट जैवविविधता संवर्धनाबाबत बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. तेथील जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली. पश्चिम घाट जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत  मुख्यमंत्री यांच्या वर्षा या निवासस्थानी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी …

Read More »

नव्या पर्यावरण कायद्याच्या मसुद्याचे पुर्नमुल्यांकन करा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना विनंती

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (environment impact assessment – ईआयए) अधिसूचनेच्या मसुद्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. या मसुद्याचे पुनर्मुल्यांकन करण्याची त्यांनी विनंती केली. सध्या अस्तित्त्वात असलेली अधिसूचना पॅरिस कराराशी जुळत नाही आणि आपल्या …

Read More »

मुंबईसह, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढणार हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या भागात उद्या ४ ऑगस्ट २०२० रोजी पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने आज दिला. तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार असणार असल्याची माहितीही त्यांच्याकडून एका प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली. यापूर्वीच ३ ते …

Read More »

मुंबई महानगर, ठाणे, पालघर जिल्ह्यात पाऊसच पाऊस ५ जुलै सकाळपर्यंतची आकडेवारी हवामान खात्याकडून जाहीर

मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहर, उपनगर आणि कोकणातील काही भागात ४ आणि ५ जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. त्यानुसार कालपासून पडणाऱ्या पावसाने अखेर दुपारी ३ च्या जवळपास उघडीप दिली. मात्र या मागील ३० तासात जवळपास ३०० मिमी पर्यंतचा पाऊस कोसळल्याचा अंदाजही या विभागाने …

Read More »

अंदाज खरा ठरला ! मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस दुपारनंतर मान्सूनची हजेरी

मुंबई: प्रतिनिधी हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि महानगरात मुसळधार पावसासह मान्सूनने हजेरी लावली. विशेष म्हणजे यावेळी हवामान खात्याने १२ आणि १३ तारखेला मान्सूनच्या सरी मुंबई, पुणे येथे कोसळणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता. मुंबईत शहरातील बहुतांष भागात पावसाने दुपारी हजेरी लावली. सुरुवातीला हलक्या सरींचा पाऊस पडला. मात्र नंतर …

Read More »

मान्सूनचे आगमन, अतिमुसळधार पाऊस या भागात पडणार दक्षिण कोकण, रत्नागिरी, सोलापूर, मराठवाडा भागात लवकरच

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून अरबी समुद्रात मान्सून दाखविणारा कमी दाबाचा पट्टा दिसून येत आहे. त्यामुळे पुढील ४-५ दिवसात मुंबई, पुणेसह मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. मान्सून हा दक्षिण कोकण, रत्नागिरीमधून तो मध्य महाराष्ट्रातील ,सोलापूर आणि मराठवाडा येथे लवकरच पोहोचणार असून पुढील …

Read More »

पर्यावरण विभागाचे नाव आता “पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग” पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वांवर कार्य करणार असल्याची पर्यावरण मंत्री ठाकरेंची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे नाव आता “पर्यावरण व वातावरणीय बदल” विभाग असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हा बदल करण्यात येईल. तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वांवर कार्य करेल, अशी घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री …

Read More »

रत्नागिरीत चक्रीवादळामुळे चार जण जखमी जीवीतहानी नाही वित्तहानी नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

रत्नागिरी: प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात ४ जण जखमी झाले मात्र जीवितहानी नाही. तसेच नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानीबाबत २ दिवसात भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत …

Read More »

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई जिल्ह्यातील सर्व विभागांनी दक्ष रहावे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी ३ जून रोजी येणाऱ्या संभाव्य चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील महसूल व अन्य महत्त्वाच्या विभागांनी आपत्कालीन व्यवस्थेसह दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिल्या आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, बेस्ट, महसूल, आरोग्य आदी महत्त्वाच्या विभागासोबत संभाव्या वादळाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या. रेल्वेची वाहतूक …

Read More »

मान्सूनचे मुंबईत ११ जूनला आगमन १८ जून पर्यंत राज्यात पोहोचणार

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मे महिना संपण्यासाठी अवघे १० दिवस शिल्लक राहीलेले आहेत. लॉकडाऊन असला तरी आणि सततच्या तापमान वाढीमुळे नागरिकांना धड घरातही बसता येईना आणि बाहेरही जाता येईना. मात्र आता नागरिकांना दिलासादायक वृत्त असून यंदा मान्सूनचे ११ जूनला मुंबईत आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्यादृष्टीने पिकांचे नियोजन करावे …

Read More »