Breaking News

राजकारण

नितीशकुमार यांनी घेतली आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ महागठबंधन सरकारमध्ये आरजेडीचे तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून येथे नितीशकुमार यांनी भाजपाशी काडीमोड घेत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी भाजपासोबत असलेली युती तोडून राष्ट्रीय जनता दल (राजद) तसेच इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन महागठबंधनची स्थापना केली. नितीशकुमार यांच्यासोबत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव …

Read More »

शरद पवार म्हणाले, भाजपा त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांना संपविते बिहारमधील राजकिय उलथापालथीनंतर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य

महाराष्ट्रानंतर संख्याबळाच्याबाबत दुसऱ्या स्थानी असलेल्या बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांनी भाजपाबरोबरील सरकारचा राजीनामा देत काँग्रेस, डावे आणि आरजेडीच्या सहकार्याने पुन्हा महागठबंधन सरकार स्थापन केले. भाजपा नेते सुनिल कुमार मोदी यांनीही महाराष्ट्राचे उदाहरण देत नितीशकुमार यांना इशारा दिला. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. शरद …

Read More »

पहिल्या विस्तारात डावलूनही बच्चू कडू म्हणाले, शब्द दिला होता पण… नाही मिळालं तरी चांगलं

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिक्षण राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी सेनेत बंडाचे निशाण फडकाविणाऱ्या एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दर्शवित त्यांच्यासोबत गेले. मात्र आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात बच्चू कडू यांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांना विचारले असता ते म्हणाले, …

Read More »

निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांची ‘ती’ विनंती केली मान्य दिली चार आठवड्यांची मुदत

शिवसेनेतील बंडावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यातील कायदेशीर लढाई प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दोन दिवसानंतर सुनावणी होणार आहे. मात्र निवडणूक आयोगास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केलेली असली तरी पक्ष नेमका कोणाचा याप्रकरणी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरु ठेवण्यास एकप्रकारे मान्यता दिली. या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी यासंदर्भात नुकतीच केंद्रीय …

Read More »

जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य, ‘त्या’ कहाण्या आठ-दहा दिवसात समोर येतील मुख्यमंत्र्यांनी जे सहकारी निवडले आहेत त्यांनी चांगलं काम करावं ;

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे सहकारी निवडले आहेत त्यांनी चांगलं काम करावं, आम्ही महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम करु व जनतेचे प्रश्न विरोधात बसून सोडवू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आज शिंदेसरकारच्या १८ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला असून या शपथविधीनंतर …

Read More »

बिहारमध्ये पंतप्रधान मोदींना हादरा, भाजपाबरोबरील नितीश कुमार यांचा संसार मोडीत काँग्रेस, आरजेडी आणि डाव्यांबरोबर पुन्हा सत्ता स्थापन करणार

महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी शिवसेनेत बंड घडवून आणत भाजपाने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांना सोबत घेत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची स्थापना केली. तर दुसऱ्याबाजूला बिहारचे नितीश कुमार यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे मुख्यमंत्री पदावर बसवित भाजपाने सरकार चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील संयुक्त जनता दल आणि …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, राज्यातील ED सरकार महाराष्ट्रासाठी की गुजरातसाठी? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत मात्र बुलेट ट्रेनवर ६ हजार कोटींची उधळपट्टी

राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होऊन ३९ दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी हे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. विदर्भ, मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यास या सरकारकडे पैसे नाहीत. पण गुजरातच्या हिताचा व पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा ड्रिम प्रोजेक्ट बुलेट ट्रेनसाठी ६ हजार कोटी …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिंदे-फडणवीस सरकारला मोदींच्या ‘त्या’ वाक्याचा विसर मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला मंत्र्यांचा समावेश नाही

सत्तांतरानंतर जवळपास ४० दिवस रखडलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या ९ तर शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या दोन्ही पक्षांकडून महिला मंत्र्यांचा समावेशच करण्यात आला नाही. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य …

Read More »

नवनियुक्त १८ मंत्र्यांचा अल्प परिचय माहित आहे का? मग वाचा भाजपा-शिवसेना मंत्र्यांचा माहिती थोडक्यात

शिंदेे-फडणवीस सरकारच्या आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात नवनियुक्त १८ जणांना मंत्री पदाची शपथ दिली. हे सर्व आमदार पूर्वी कधी मंत्री झाले होते. त्यांचा मतदारसंघ कोणता? त्याचे जन्मसाल, शिक्षण, त्यांनी केलेल्या कामाचा माहिती यासह त्या सर्वांचा अल्प परिचय खालील प्रमाणे :- विखे–पाटील, श्री. राधाकृष्ण एकनाथराव जन्म : 15 जून, 1959. जन्म …

Read More »

राज्यपालांनी या १८ नवनियुक्त मंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ भाजपाच्या जून्या तर काही नव्यांची मंत्रीपदावर वर्णी

सत्तांतरानंतर जवळपास ४० दिवस रखडलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज राजभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी १८ जणांना पद व गोपनियतेची शपथ दिली. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या मंत्र्यांनी सर्वात आधी शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपातील …

Read More »