औरंगाबादः प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरीकांनी वेळीच सावध व्हावे अन्यथा कठोर निर्णय घेण्यावाचून पर्याय राहणार नसल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून अनेक जण मास्क वापरण्याचे बंद केले आहे. त्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल असा इशारा देत कोरोनावर कोणीही राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रश्नी आपण उद्या मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध घालण्याचे संकेत त्यांनी दिले.
Tags ajit pawar cm uddhav thackeray corona in maharashtra ncp rajesh tope
Check Also
लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …