देव माणूस झी मराठीवरील सातारा येथे घडलेल्या सत्य घटनेवर आधारित मालिकेने प्रेक्षकांचं चांगलेच मनोरंजन केले होते, या मालिकेत मुख्य भूमिका निभावत असलेल्या किरण गायकवाड याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. त्यापूर्वी लगीर झालं जी कार्यक्रमात खलनायकाची भूमिका सुद्धा प्रेक्षकांना फारच आवडली होती. सध्या तो एका नव्या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
किरणची खासकरुन तरुणींमध्ये विशेष क्रेझ आहे.त्यामुळेच त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. यामध्येच अभिनेता निखिल चव्हाण याने किरणविषयी एक खुलासा केला आहे. त्याच्या या खुलाशामुळे सगळ्यांच्या नजरा किरणकडे वेधल्या गेल्या आहेत.’लागिरं झालं जी’ या मालिकेत किरण आणि निखिल यांनी एकत्र काम केलं होतं. परंतु, त्यांची मैत्री फार पूर्वीपासून आहे.
किरण आणि निखिल या दोघांना एकमेकांच्या जीवनातील अनेक लहानमोठ्या गोष्टी ठावूक आहेत. अलिकडेच या जोडीने लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये एक गेम खेळत असताना निखिलने किरणविषयी मोठा खुलासा केला. किरणने एकाच वेळी दोन मुलींना डेट केलंय असं निखिलने यावेळी सांगितलं.