Breaking News

मलिकांचा सवाल, रझा अकादमीच्या कार्यालयात आशिष शेलार काय करत होते? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी राज्यात हिंसाचार होण्याच्या आधी भाजपाचे आमदार आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात बसून काय करत होते?, कोणाशी बैठक करत होते ? असा सवाल करत अमरावती येथील हिंसाचारासाठी मुंबईतील आमदाराने पैसे पाठविले असून त्यासाठी तेथील तरूणांना पैसे दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात …

Read More »

‘या’ दोन कंपन्यांचे आयपीओ पुढील आठवड्यात फक्त १५ हजार रूपयांची गुंतवणूक करा

मुंबईः प्रतिनिधी पुढील आठवड्यात दोन कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. आयपीओतून या दोन्ही कंपन्या मिळून २ हजार कोटींहून अधिक रक्कम उभारणार आहेत. यासह पॉलिसी बाजारची मूळ कंपनी पीबी फिनटेकचे शेअर बाजारात लिस्टिंगही होणार आहे. गो फॅशनचा अंक आयपीओ १७ नोव्हेंबरला सुरू होऊन २२ नोव्हेंबरला बंद होईल. कंपनी आयपीओमार्फत १,०१३ कोटी रुपये …

Read More »

राज्यातील हिंसाचाराबद्दल रझा अकादमीवर बंदी घाला पदाधिकाऱ्यांना तातडीने अटक करा-भाजपा आ. नितेश राणे यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्यात काही ठिकाणी नुकताच झालेला हिंसाचार रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी पद्धतशीरपणे घडवून आणला आहे. या हिंसाचाराबद्दल रझा अकादमीवर बंदी घाला आणि रझा अकादमी च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तातडीने अटक करा, अशा मागण्या भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी केल्या. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते …

Read More »

रेल्वे तिकीट दर ३० टक्क्यांनी स्वस्त होणार १४ तारखेला फक्त आरक्षण करता येणार नाही

मुंबईः प्रतिनिधी रेल्वे आपली प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) अपग्रेड करत आहे. हे अपग्रेडेशन १४ नोव्हेंबरच्या रात्री ते २१ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत होईल. या दरम्यान रात्री ११.३० ते पहाटे ५.३० या वेळेत रेल्वे तिकीट बुक करता येणार नाही. यामध्ये नवीन ट्रेनची संख्या आणि इतर डेटा अपग्रेड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रेल्वेची लांब …

Read More »

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शिवभक्त आणि पुणेकरांकडून अखेरचा निरोप वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणेः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाने भारावून जात केवळ शिवचरित्राची माहिती प्रसारीत करण्याचे काम अखेरपर्यंत करत राहणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे ५ वाजता निधन झाले. त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास त्यांना शिवभक्त आणि पुणेकरांनी वैकुंठ स्मशानभूमीत अखेरचा निरोप दिला. त्यांनी नुकतीच आपल्या वयाची शंभरी पार केली होती. …

Read More »

काँग्रेस जनतेच्या दरबारात महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे ‘जनजागरण अभियान’!: नाना पटोले

वर्धा- मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई गगणाला भिडली आहे. अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी, कामगार, छोटे व्यापारी, दुकानदार यांना भांडवलदारांचे गुलाम करुन मोदी सरकारने जगणे कठीण केले आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच देश २५ वर्षे मागे गेला असतानाही जनतेच्या हिताचे निर्णय …

Read More »

प्रिय चेतन भगत, धर्मनिरपेक्षतता हा काही तितकासा वाईट नाही तर सुंदर शब्द आहे लेखन:स्वामिनाथन एस.अंकलेश्वरीया अय्यर

तु जे काही तुझ्या कॉलममध्ये लिहितोस ते मला आवडतं. परंतु तु नुकताच लिहिलेला “Hate smug liberals? But don’t hate secularism just because they like it” अर्थात ‘आत्मसंतुष्ट उदारमतवाद्यांच्या तिरस्कार? परंतु धर्मनिरपेक्षितेचा तिरस्कार करू नका कारण त्यांना ते फार आवडते’. उदारमतवादी लोक आत्मसंतुष्ट असण्याबाबत मला माहिती आहे. मात्र मला सर्वाधिक काळजी …

Read More »

मविआला रोखण्यासाठी भाजपा ठरविणार या मुद्यांवर रणनीती प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची प्रदेश कार्यकारिणी बैठक मंगळवार, १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार असून भ्रष्टाचार, गुन्हेगारीकरण आणि महाविकास आघाडी सरकारकडून झालेली जनतेची फसवणूक या महत्त्वाच्या विषयांबाबत बैठकीत पक्षाची भूमिका स्पष्ट होणार आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रविवारी दिली. केशव उपाध्ये म्हणाले …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, “अब हिंदू मार नहीं खाएगा” अमरावती हिंसाचारानंतर भाजपाची प्रतिक्रिया

पुणे: प्रतिनिधी त्रिपुरामध्ये घटना घडली की नाही हा प्रश्न आहे. पण त्यासाठी अमरावती, नांदेड, मालेगाव मध्ये अशांतता पसरवणे हे कितपत योग्य आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये जे घडलं ती, हिंदुंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. अब हिंदू  मार नहीं खाएगा, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.‌ पुण्यात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. १९९३ च्या दंगलीत …

Read More »

आशिष शेलारांनी ठाकरे सरकारला दिली रक्तपिपासूची उपमा रक्तपिपासू ठाकरे सरकारमुळेच एसटीच्या ४० कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई: प्रतिनिधी आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची आज भेट घेत ॲड आशिष शेलार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना साथ आणि समर्थन देत असल्याचे सांगत आणि सरकारला इशारा देत म्हणाले, की गुमान चर्चा करा, सोपा मार्ग काढा, सरळ विलनीकरण करा त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करा. ४० जणांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेलं हे सरकार …

Read More »