Breaking News

Editor

युनोचे सरचिटणीस म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदीचा मसुदा महात्मा गांधींच्या प्रेरणेतून

आज भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना भारताने गेल्या ७५ वर्षांत शांतता, स्थैर्य, सुरक्षा आणि सर्वसमावेशकता निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्र -भारत परस्पर भागीदारी, दक्षिण – दक्षिण सहकार्य वृध्दिंगत करणे या विषयावर संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस …

Read More »

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त होईल

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय हा लोकशाही पद्धतीने झाला असून देशात काँग्रेस हाच एक पक्ष आहे ज्या पक्षात कार्यकर्त्यांमधून अध्यक्ष निवडला जातो. मल्लिकार्जून खर्गे यांचा दांगडा अनुभव व सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मजबूत होईल आणि केंद्रातील हुकूमशाही सरकारचा पराभव …

Read More »

‘या’ विषयांसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सध्या राज्यात सुरु असणाऱ्या पावसाने रब्बीचा हंगाम सुध्दा धोक्यात आला असल्याने राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी करत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, पुणे मनपात मागील पाच वर्षात ‘अर्थाचा अनर्थ’ झाला पुण्यातील पावसाच्या संकटाची शास्त्रीय चौकशी व्हावी...

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारने जनतेच्या मदतीला जायला पाहिजे होते मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. जयंत पाटील म्हणाले, पुण्यात प्रलय आल्याने शहराची …

Read More »

भाजपा म्हणते, उद्धव ठाकरेंच्या राजकारणात ‘मुंह मे राम, बगल मे राहुल’

प्रत्येक नेत्याला मातोश्रीवर येण्यासाठी भाग पाडणारा बाळासाहेबांचा आदरयुक्त दबदबा उद्धव ठाकरेंनी रसातळाला पोहोचवला आहे. पक्ष, संघटना किंवा कार्यकर्त्यांसाठी कधीही घराबाहेर न पडलेले उद्धव ठाकरे आता राहुल गांधींच्या पदयात्रेसाठी पायघड्या घालण्यासाठी घराबाहेर पडणार हा उद्धव ठाकरे यांच्यावर काळाने उगवलेला सूड आहे, अशी खोचक टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी …

Read More »

मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीएच्या पत्राला बिल्डरकडून वाटाण्याच्या अक्षता

मागील सहा वर्षाहून अधिक काळ राज्याचे नगरविकास मंत्री आणि सद्यस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून जाहिर कार्यक्रमातून सांगत असतात. मात्र त्यांच्याच कार्यकाळात प्रकल्प बाधित नागरीकांना इमारत बांधून त्यांचे पुर्नवसन केले. परंतु त्या प्रकल्प बाधित नागरिकांना विकासकाने गळकी इमारत बांधून दिल्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या संस्थेकडे तक्रारीही …

Read More »

फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात धारावी आणि समृध्दी सोबत हायस्पीडला ट्रेनला गती

आशियातील सर्वांत मोठा पुनर्विकास प्रकल्प असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची जागा प्राप्त करण्यासाठी आज रेल्वे मंत्रालयाच्या रेल लँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरण यांच्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत ‘डेफिनेटिव्ह अ‍ॅग्रीमेंट’वर स्वाक्षरी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि …

Read More »

मुंबईचा पोलिस आयुक्त कोण? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात मतभेद आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या

कोणाला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून नाराज, कोणाचा मतदार संघ कोणासाठी सोडायचा यावरून नाराजी, कोण हवेत गोळाबार करतोय, तर कोण सरकारी कार्यालयाची तोडफोड तर कोण अधिकाऱ्याला थोबाडतोय यामुळे राज्य सरकारात नाराजी, अशी नाराजी नाट्य राज्यात चालूच आहे. मात्र या सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्येच चक्क नाराजी पसरलेली आहे. आता …

Read More »

संजय राऊतांच्या जामीनावर अर्जावर तारीख पे तारीख पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती मात्र आज होणारी सुनावणी आता २१ ऑक्टोबरला होणार असल्याने त्यांचा न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने त्यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे. राऊत यांच्या जामीन अर्जावर आता येत्या २१ तारखेला सुनावणी …

Read More »

साखरेवरून मुख्यमंत्री शिंदेनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरणच सुरु ठेवावे

साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे. कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून यामुळे कारखान्यांना मर्यादा येतील, यासंदर्भात आपण हस्तक्षेप करून वाणिज्य तसेच ग्राहक संरक्षण आणि अन्न व सार्वजनिक मंत्रालयाला योग्य तो निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. आपल्या …

Read More »