Breaking News

माजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील मराठा समाजाचा विकासाच्यादृष्टीने सारथी संस्थेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी करत दुसऱ्याबाजूला मात्र राज्य सरकार अनुसूचित जाती-जमाती, एनटी, व्हीजेएनटी आदीबाबत निर्णय घेण्याचे टाळत सामाजिक न्यायाच्या भूमिकेच्या माध्यमातून सामाजिक अन्यायच करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मागील सरकारने अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष साजरा करण्याचा निर्णय घेत १०० कोटी रूपयांची तरतूद केली होती. मात्र त्यातील एक रूपयाही अद्याप खर्च करण्यात आलेला नाही. तसेच समता प्रतिष्ठानची स्थापना करत ६० कोटी रूपये देण्यात आले. मात्र आता ही संस्थाच मोठीत काढण्याचा घाट राज्य सरकारकडून सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

सविस्तर व्हिडिओ पाह्यला विसरू नका…

Check Also

राहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका शस्त्राविना सैनिकांना बॉर्डरवर का पाठविले?

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी लडाख येथील गलवान येथे बंदोबस्तासाठी असलेल्या भारतीय-चीनच्या सीमेवर असलेल्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *