Breaking News

सर्वोच्च न्यायालयामुळे “त्या” विषयावरील राजकारण थांबेल राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचे प्रतिपादन

मराठी ई-बातम्या टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संरक्षणातील त्रुटीचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून याप्रकरणाची स्वतंत्र चौकशी होवून योग्य तो निर्णय होईल. तसेच याप्रश्नावरून सुरु झालेले राजकारण थांबेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ जारी करत याविषयीचे भाष्य केले.

मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र हॉस्पीटलायझेशन होत नाहीत. तर ते होम आयसोलेशनमध्ये दाखल होत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध तयार करण्यात येत आहेत. त्याचे नागरीकांनी पालन करावे आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी असलेल्या आवश्यक गोष्टी कराव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Check Also

राहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका शस्त्राविना सैनिकांना बॉर्डरवर का पाठविले?

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी लडाख येथील गलवान येथे बंदोबस्तासाठी असलेल्या भारतीय-चीनच्या सीमेवर असलेल्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *