Breaking News

Tag Archives: rajesh tope

अ.नगर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ७ लाखाची मदत: आठवड्यात चौकशी अहवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोनावरील उपचारासाठी रूग्णालयात दाखल झालेल्या अहमदनगर जिल्हा रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचावलेल्या रूग्णांना वेळेत उपचार मिळतील याकडे रूग्णालयाच्या प्रशासनाने लक्ष देण्याचे आदेश देत आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखाची आर्थिक मदत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी …

Read More »

राज्यात तीस नोव्हेंबर पर्यंत शंभर टक्के लसीकरण करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना उद्दिष्ट्य

मुंबई : प्रतिनिधी विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. कोरोनाची साथ …

Read More »

आता सरकारी आणि आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही दोन लसमात्रा बंधनकारक अन्यथा प्रवासाला मज्जाव- राज्य सरकारकडून नवे अध्यादेश

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागात कार्यरत कर्मचारी व अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी यांना आता दोन लसींची मात्रा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर या कर्मचाऱ्यांनी दोन लस मात्रा आणि १४ दिवासांचा कालावधी पूर्ण केला नसेल तर आता अशा कर्मचाऱ्यांना रेल्वे लोकल प्रवासासह अन्य …

Read More »

आरोग्य विभाग परीक्षेतील गोंधळाबद्दल टोपे यांनी राजीनामा द्यावा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी आरोग्य विभागाच्या रविवारी झालेल्या परीक्षेत तिसऱ्यांदा गोंधळ उडाल्याने अनेक विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप भोगावा लागला. या गोंधळाला आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच जबाबदार असून या गोंधळाची जबाबदारी स्वीकारत टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. भांडारी यांनी पत्रकात म्हटले …

Read More »

आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ: परिक्षार्थींनी व्यक्त केला संताप आरोग्य मंत्री म्हणतात तांत्रिक अडचण आली असेल

मुंबई: प्रतिनिधी आरोग्य विभागाच्या भरती परिक्षेच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून सुरु असलेली गोंधळाची परिस्थिती परिक्षेच्या दिवशीही कायम राहीली आहे. त्यामुळे अनेक परिक्षार्थींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याने अनेक परिक्षार्थींनी संताप व्यक्त केला आहे. तसेच आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारला या त्रासाचे कारणीभूत ठरविले. भरती प्रक्रियेसाठी न्याया कम्युनिकेशनला काम दिल्यापासून अर्ज भरलेल्या …

Read More »

या उपसंचालकांच्या निरीक्षणाखाली होणार आरोग्य विभागाची लेखी परीक्षा उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती-संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी जारी केले आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पद भरतीसाठी २४ आणि ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजी परीक्षा होणार आहे. परीक्षा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने व्हाव्यात यासाठी राज्यस्तरीय निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची आठ परिमंडळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित परिमंडळासाठी संपर्क अधिकारी म्हणून काम करतील. आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी …

Read More »

अखेर आजपासून दुकाने ११ पर्यंत तर हॉटेल्स १२ वाजेपर्यत खुली राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाची परस्थिती आटोक्यात आल्याने परिस्थिती पूर्वरत करण्याच्या अनुशंगाने दुकाने आणि हॉटेलच्या वेळा वाढविण्याचे संकेत काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी टास्कफोर्स समोबतच्या बैठकीत दिले. त्यानुसार आजपासून सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यत तर उपहारगृहे, हॉटेल्स, बार-रेस्टॉरंट १२ वाजेपर्यत सुरु ठेवण्यास परवानगी दिली. यासंदर्भात आज दुपारी राज्य सरकारकडून …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंचे संकेत तर टोपेंकडून थेट वेळाच जाहिर राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार; अम्युझमेंट पार्क देखील सुरू करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून राज्यात कोरोना बाधित आढळून येण्याच्या संख्येत चांगलीच घट होताना दिसत आहे. तसेच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे, उपाहरागृहे, दुकानांच्या वेळात वाढ करण्याचे संकेत आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. मात्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी थेट वेळाच जाहिर करत दुकानांच्या वेळा रात्री …

Read More »

आरोग्य विभागाच्या परिक्षा गोंधळावर संचालकांचा खुलासा विभागाच्या परीक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार-आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील

मुंबई: प्रतिनिधी आरोग्य विभागाकडून घेण्यात येत असलेल्या परिक्षेतील गोंधळ काही केल्या कमी होण्यास तयार नसून अनेक परिक्षास्तुक उमेदवारांना त्यांनी मागितलेल्या परिक्षा केंद्रापेक्षा वेगळेच केंद्रे मिळाले असल्याच्या घटना उघडकीस येत आहे. यापार्श्वभूमीवर आरोग्य सेवा संचालिका डॉ.अर्चना पाटील यांनी यावर खुलासा करत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परिक्षेसाठी केंद्र …

Read More »

आजपासून मिशन कवच कुंडल अभियान : दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरण सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर पर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य मंत्री टोपे यांनी या अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. …

Read More »